शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

द्वारपोच योजना थंड बस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाने द्वारपोच योजना सुरू केली होती. परंतु ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात थंड बस्त्यात असल्याने, वाहनधारकांचे लाखो रुपये थकले आहेत.ग्रामीण भागातील गोरगरिबांना वेळेवर अन्नधान्य मिळावे, अन्नधान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने मागील वर्षीपासून द्वारपोच योजना ...

ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील प्रकार लाखो रुपये थकल्याने वाहनधारक त्रस्त!गोरगरिबांना अन्नधान्य मिळावे यासाठी शासनाने सुरू केली होती योजना

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच अन्नधान्य मिळावे, यासाठी शासनाने द्वारपोच योजना सुरू केली होती. परंतु ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात थंड बस्त्यात असल्याने, वाहनधारकांचे लाखो रुपये थकले आहेत.ग्रामीण भागातील गोरगरिबांना वेळेवर अन्नधान्य मिळावे, अन्नधान्याची अफरातफर होऊ नये, यासाठी शासनाने मागील वर्षीपासून द्वारपोच योजना सुरू केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील द्वारपोच योजनेचे कंत्राट श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे राजीव गुप्ता यांनी घेतलेले आहे. त्यांनी मेहकर तालुक्यात अन्नधान्य द्वारपोच पोहचविण्यासाठी वाहतूक ठेकेदाराची नेमणूक केली होती. या वाहतूक ठेकेदाराने जवळपास सात वाहने या योजनेसाठी लावलेली होती. सुरुवातीच्या काळात ही द्वारपोच योजना मेहकर तालुक्यात सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर या द्वारपोच योजनेचा पूर्ण कारभार ढेपाळला होता. नियोजनाअभावी दुकानदारांचा माल वेळेवर जात नव्हता. त्यामुळे गोरगरिबांना वेळेवर धान्य पुरवठा होत नव्हता. मात्र, तेरी भी चूप मेरी भी चूप, असा कारभार सुरू असल्याने कोणीच बोलायला तयार नव्हते. अनेक दुकानदारांचा माल कमी-जास्त प्रमाणात जात होता. दरम्यान, गेल्या १० ते ११ महिन्यांपासून मेहकर तालुक्यात द्वारपोच योजना सुरू आहे; परंतु वाहतूक ठेकेदाराचे बिले थकली आहेत.वाहतूक ठेकेदारावर उपासमारीची पाळीद्वारपोच योजना राबविण्यासाठी वाहतूक ठेकेदाराने मेहकर तालुक्यासाठी गेल्या १० ते ११ महिन्यांपासून सात वाहने लावली होती. या वाहनधारकांना दरमहा वाहतुकीची बिले मिळाली नसून, जवळपास २० लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे वाहतूक ठेकेदारावर उपासमारीची पाळी आली आहे.वाहतूक ठेकेदाराने त्यांची बिले न मिळाल्याने वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीपण दुकानदारांना माल वेळेवर मिळावा, यासाठी पर्यायी व्यवस्था करुन, दुकानदारांना वेळेवर माल देऊ.- ए.एम. सय्यदनिरीक्षण अधिकारी, अन्नपुरवठा विभाग, मेहकर.