शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये - नलावडे

By admin | Updated: October 9, 2016 01:55 IST

कान्हा चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे यांचे परखड मत.

बुलडाणा, दि. 0८- उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतातील चित्रपटात काम द्यायचे नाही, यामध्ये दोन मत प्रवाह आहेत. भारतात कोणत्याही प्रकारचा जातीभेद केल्या जात नाही. पंतप्रधान मोदी हे सुद्धा सर्वधर्म समभावाचे पुरस्कर्ते आहेत. पाकिस्तानी भारतामध्ये कलाकार म्हणून जगत असेल व तो भारताशी प्रामाणिक असेल, त्या कलाकाराला काम दिलेच पाहिजे. भारताशी गद्दारी करणार्‍या पाकिस्तानी कलाकाराला काम देऊ नये, कारण कलाकाराला कोणतीही जात नसते, असे परखड मत ह्यकान्हाह्ण चित्रपटातील अभिनेत्री गौरी नलावडे यांनी मांडले. बुलडाणा अर्बन व बीसीसीएनच्यावतीने सुरू असलेल्या गरबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ८ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथे आल्या असता, आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, बीसीसीएनचे संचालक सुधाकर अहेर, अँड. जितेंद्र कोठारी, सुधीर भालेराव यांची उपस्थिती होती. अभिनेत्री गौरी नलावडे म्हणाल्या, की मी विविध मराठी सिरिअलच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांसमोर आले. सैराटसारख्या चित्रपटामधून नागराज मंजुळे यांनी जे काही दाखविले आहे, ते वास्तव आहे. मुलांच्या भावना आई-वडील कशा दाबून ठेवतात, हे दाखविले. हेच मराठी प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे मराठी चित्रपटाला चांगले दिवस आलेले आहेत. माधुरी दीक्षित ही माझी प्रेरणा असून, ती ज्याप्रमाणे जीवन जगते तसेच मलासुद्धा जगायला आवडते. तिने मराठी जोडीदार निवडला मी सुद्धा मराठी जोडीदार निवडणार आहे. मला गायलासुद्धा आवडते. आई व वडिलांच्या आशीर्वादाने क्षेत्रात पर्दापण केले. वास्तविक आई प्रोफेसर व वडील एअर फोर्समध्ये असतानासुद्धा मी या क्षेत्रामध्ये करिअर करते. निसर्गरम्य बुलडाणा शहरातील मराठी चित्रपटप्रेमींनी आवडणार्‍या कथेवर चित्रपट काढल्यास त्यात मी नक्की भूमिका करेल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रास्ताविक सुधीर भालेराव यांनी केले.