शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांमध्ये आढळतो जंतदोष, जंतनाशक गोळ्या दिल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जंतदोष हे ...

वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जंतदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे जंतदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. बालकांमध्ये आढळणाऱ्या जंतदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाकडून २१ सप्टेंबरपासून राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

काय आहे जंतदोष?

जंतदोष म्हणजे दूषित मातीच्या संपर्कात आल्याने शरीरात जंताचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शरीरातील रक्त कमी होणे,अशक्तपणा येमे, कुपोषण वाढणे आदी आजार जडतात.

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते ६ वयोगटांतील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटांतील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. यासोबतच आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांच्याकडे संपर्क साधल्यास गोळ्या मिळू शकतात.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या

१ ते ६ वयोगटांतील सर्व मुले व ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना हा आजार होऊ शकतो. म्हणून हा आजार संपुष्टात आणण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना या गोळ्या वाटप केल्या जातात.

जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून २१ सप्टेंबरपासून सर्वत्र या जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेत एकही मूल वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

-डॉ. रवींद्र गोफणे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा