शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

केंद्रीय योजनांच्या समन्वयातून विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. तसेच राज्य शासनाच्या योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा आहे. त्यामुळे या योजनांची प्राधान्याने सांगड घालून ...

केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. तसेच राज्य शासनाच्या योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा आहे. त्यामुळे या योजनांची प्राधान्याने सांगड घालून त्याचा लाभ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, बाजार समिती सभापती जालिंधर बुधवत, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग या वेळी उपस्थित होता.

दरम्यान, पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नानुसार जोखीम स्तर ठरवून विमा मंजूर करण्याच्या सूचना खा. जाधव यांनी देत पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यासाठी पाठपुरावा करावा. शेततळ्याच्या योजनेसंदर्भातही त्यांनी माहिती जाणून घेतली. पीक कर्ज वितरणामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जावा. तथा नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजमाफीचा लाभ मिळत नाही, त्यादृष्टीनेही प्रयत्न केले जावेत, असे ते म्हणाले.

--कामाच्या पूर्ततेनंतरच कंत्राटदाराला प्रमाणपत्र--

रस्ता निर्मितीमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना खा. जाधव यांनी देत रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य ठेवला पाहिजे, असे सांगितले. सोबतच चिखली-मेहकर रस्ता कामामध्ये लव्हाळा फाटा येथील उड्डाणपुलावर अपघात होण्याची शक्यता आहे. तेथील कामात दुरुस्ती केली जावी. भूसंपादन आवश्यक असल्यास ते करून घ्यावे तसेच गरजेनुरूप मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर बसथांबे उभारण्यात यावे. विहीत मुदतीत कामे होतील याची दक्षता घेऊन १०० टक्के काम झाल्यानंतरच कंत्राटदाराला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

--जलजीवन मिशनची कामे मार्गी लावा--

जलजीवन मिशनचीही कामे गुणवत्तापूर्ण करून प्रादेशिक योजना करताना सर्व समाविष्ट गावांना पाणी मिळेल याची खात्री करून निर्धारित कालावधीत योजना पूर्ण केल्या जाव्यात. खारपाणपट्ट्यातील उर्वरित गावांसाठी एकत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करावी. निमखेडी ९ गावे, तिव्हाण १० गावे, चिंचोली ३० गावे पाणीपुरवठा योजना एकत्र करावी. त्याद्वारे खर्चाची बचत होईल. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची कामे दर्जेदार करावी. मनरेगा अंतर्गत ‘पाहिजे ते काम’ संकल्पनेची अंमबजावणी व्हावी, असेही स्पष्ट केले.