शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

परीक्षा क्षुल्क परत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

प्रकल्पांतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. ...

प्रकल्पांतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ

बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील ४१३ गावांमधील शेतकरी या प्रकल्पांतर्गत सुखी, समृद्ध हाेण्यास मदत झाली आहे.

अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी

सिंदखेड राजा : तालुक्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून अवैध दारू विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. दारू विकत घेण्यासाठी बाहेरगावातील लाेक गर्दी करीत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती आहे.

वीज कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी

धामणगाव बढे : गावामध्ये वीज वितरणसंदर्भात विविध समस्या असताना व वेळोवेळी त्या संबंधीचे निवेदन देऊनही त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी

बुलडाणा : प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत. इमारत परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक कुठेही आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी हाेत आहे.

सुतारांना आर्थिक मदत देण्याची मागणी

साखरखेर्डा : लाॅकडाऊनमुळे सुतारकाम करणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट आले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सुतार व्यवसाय करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. कामे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने मदत देण्याची मागणी हाेत आहे.

खताचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत

धामणगाव धाडः निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले

साखरखेर्डा : लाॅकडाऊनच्या काळात किराणा दुकानदारांची चांदी होत असून, शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने मालाची विक्री केली जात आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.

विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून पाच महिने लोटले असतानाही व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीचीही मदत पीकविमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावरही कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.

औषधांचा काळा बाजार थांबवा

बुलडाणा : कोरोना औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी ग्राहक पंचायतच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.