युवक काँग्रेसचे लोणार तालुका अध्यक्ष भारत राठोड यांच्या सह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. लोणार येथे येणाऱ्या पर्यटकांना लोणारला येण्यासाठी त्रास होणार नाही व पर्यटनाला चालना मिळेल, तसेच लोणार सरोवर परिसरातील लोकांना व्यवसायाची संधी मिळेल. मेहकर हद्दीतील मनमानी कारभाराला आळा बसला जाईल. त्याकरिता पोलीस चौकी सुलतानपूर येथे लावण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. परिणामी राहेरी पुलाकडे जड वाहतूक जाणार नाही. देऊळगाव राजा, चिखली या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अपघाताचा धोका आहे. या बाबीचा विचार करून सर्व वाहतूक लोणार-मंठा-जालना या मार्गाने वळविण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर युवा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शे. जुनेद शे. करामत, जिल्हा सरचिटणीस प्रणव वराडे, सतीश राठोड, भारत राठोड यांची स्वाक्षरी आहे.
पालखी मार्गाने वाहतूक वळविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST