बुलडाणा : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी २0१४-१५ अंतर्गत जिल्ह्यातील दहा गावांमध्ये साखळी सिमेंट नाला बांध बांधण्यात आले आहेत. साखळी सिमेंट नाला बांधामुळे पावसाळ्यात होणार्या अत्यल्प पर्जन्यमानामध्येसुद्धा पाणी अडवून, भूगर्भामध्ये जिरुन भूजलपातळीमध्ये निश्चित वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यामध्ये गत दोन वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनियमित होणारे पर्जन्यमान व खालावलेली भूजल पातळी हे नित्याचे समिकरण या मागे कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. यावर कायमस्वरुपी उपाययोजना कारण्यासाठी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून वैधानिक विकास मंडळ अंतर्गत वर्धा व वाशिम पॅटर्ननुसार जिल्ह्यातील काही गावांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत, तसेच यातील काही गावांचा जलयुक्त शिवार अभियान टंचाईयुक्त महाराष्ट्र २0१९ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत भूजल विभागामार्फत ८0 ते ९0 टक्के कामे जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहेत.
दहा गावात साखळी सिमेंटनाला बांध
By admin | Updated: June 17, 2015 02:23 IST