शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वसंत नगर शिवारात मका पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

किनगाव जट्टू परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतातील काढणीला आलेले उभे पीक मका व शाळू ...

किनगाव जट्टू परिसरात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतातील काढणीला आलेले उभे पीक मका व शाळू ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरात अजूनही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हरभरा, गहू ही रब्बी हंगामाची पिके अजूनही शेतातच उभी आहेत. अगोदरच कोरोना महामारीने थैमान घातले असून, नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यात आता निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या बदलामुळे शेतातील उभी पिके धोक्यात सापडली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण झाली आहे. दरम्यान, या आठवड्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून, गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाली. या गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला असून, किनगाव जट्टू परिसरातसुद्धा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिसरात गहू, हरभरा, मका कांदा पिके चांगली आलेली आहेत. हे पीक सध्या काढण्याच्या मार्गावर आली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तसेच काही शेतकऱ्यांनी शेतात हरभरा पीक सोंगणी करून ठेवलेला होता. या पिकाचेसुद्धा थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतनगर शिवारातील अरुण राठोड या शेतकऱ्याचे गट नंबर १३९ मधील तीन एकर मका भुईसपाट झाला आहे. सोबतच प्रकाश राठोड यांचेसुद्धा गट नंबर १३० मधील चार एकर मका भुईसपाट झाला असल्याने शासनाने त्याची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.