शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

बुलडाणा जिल्ह्यात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ...

बुलडाणा जिल्ह्यात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या नऊ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. १८ ते १९ मार्चदरम्यान या तालुक्यातील २ हजार ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाले होते. जवळपास १०० गावांतील ४ हजार ४३३ शेतकरी त्यामुळे प्रभावित झालेले आहेत. यात प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यात दोन हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यानंतर २० व २१ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४ हजार ११२ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यात ५ हजार ४०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खामगाव तालुक्यात या पावसाने मोठा फटका दिला. १०९ गावांत या अवकाळी पावसाने कहर केला आहे. १८ मार्च ते २१ मार्चदरम्यान झालेल्या एकंदरीत नुकसानाचा विचार करता ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गावपातळीवर जाऊन झालेल्या नुकसानीचा एकंदरीत अंदाज घेत आहेत.

दरम्यान, गेल्या खरीप हंगामातही तब्बल ७४ हजार हेक्टरवर अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा जादा पावसामुळे म्हणा जिल्ह्यात नुकसान झाले होते. त्यानंतर उन्हाळ्यात हा फटका पावसाने दिला आहे.

--या पिकांचे झाले नुकसान--

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, मका, गहू, केळी, पेरू, आंबा, भाजीपाला फळपिके, भुईमूग, ज्वारी, केळी, पपई, टरबूज, हरभरा, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट व पावसामुळे आंब्याचा मोहरही गळून पडला असून, काही ठिकाणी कोयीने जाळे पकडलेल्या आंब्याला मोठा फटका बसला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

--नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -शिंगणे

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनास दिले आहेत. या अवकाळी पावसामुळे गहू, शाळू, कांदा बीज, भाजीपाला, शेडनेट व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीबांधव पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ जाऊन सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच शेतकऱ्यांना नुकसानापोटी योग्य ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.