शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

बुलडाणा जिल्ह्यात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ...

बुलडाणा जिल्ह्यात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून, जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या नऊ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. १८ ते १९ मार्चदरम्यान या तालुक्यातील २ हजार ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाले होते. जवळपास १०० गावांतील ४ हजार ४३३ शेतकरी त्यामुळे प्रभावित झालेले आहेत. यात प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यात दोन हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. त्यानंतर २० व २१ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४ हजार ११२ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यात ५ हजार ४०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खामगाव तालुक्यात या पावसाने मोठा फटका दिला. १०९ गावांत या अवकाळी पावसाने कहर केला आहे. १८ मार्च ते २१ मार्चदरम्यान झालेल्या एकंदरीत नुकसानाचा विचार करता ९ हजार ८३७ शेतकऱ्यांचे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सध्या कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गावपातळीवर जाऊन झालेल्या नुकसानीचा एकंदरीत अंदाज घेत आहेत.

दरम्यान, गेल्या खरीप हंगामातही तब्बल ७४ हजार हेक्टरवर अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा जादा पावसामुळे म्हणा जिल्ह्यात नुकसान झाले होते. त्यानंतर उन्हाळ्यात हा फटका पावसाने दिला आहे.

--या पिकांचे झाले नुकसान--

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, मका, गहू, केळी, पेरू, आंबा, भाजीपाला फळपिके, भुईमूग, ज्वारी, केळी, पपई, टरबूज, हरभरा, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट व पावसामुळे आंब्याचा मोहरही गळून पडला असून, काही ठिकाणी कोयीने जाळे पकडलेल्या आंब्याला मोठा फटका बसला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

--नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -शिंगणे

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनास दिले आहेत. या अवकाळी पावसामुळे गहू, शाळू, कांदा बीज, भाजीपाला, शेडनेट व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरीबांधव पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ जाऊन सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच शेतकऱ्यांना नुकसानापोटी योग्य ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.