शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संचारबंदी कागदावरच, नागरिकांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST

ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य लाेणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक-एक महिना नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचलेली ...

ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य

लाेणार : तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक-एक महिना नाल्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये घाण साचलेली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वन विभागाकडून चार लाखांची मदत

बुलडाणा : वन्य प्राण्यांकडून पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते. गत दाेन ते तीन वर्षांत पिकांच्या झालेल्या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना १ लाख ५१ हजार, तर पाळीव प्राण्यांच्या झालेल्या हानीप्रकरणी २ लाख ९० हजार रुपयांची भरपाई दिली आहे.

चार गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

बुलडाणा : जिल्ह्यातील चार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये माेताळा तालुक्यातील चिंचखेडनाथ व इसालवाडी तसेच चिखली तालुक्यातील तांबूळवाडी व सैलानी नगर या गावांचा समावेश आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

बुलडाणा : मार्च महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या वादळी पावसासह गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही.

नाेंदणी नसलेल्या कामगारांनाही मदत द्या

बुलडाणा : वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नाेंदणीकृत मजुरांना सरकारच्या वतीने मदत देण्यात येत आहे. ही मदत नाेंदणी नसलेल्या कामगारांनाही देण्याची मागणी हाते आहे.

पाट्या बदलून दुकाने झाली अत्यावश्यक

लोणार : कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन लागू केल्यानंतर काही व्यावसायिकांनी नवी शक्कल शोधली आहे. जुन्याच व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचे नवे रूप देऊन दुकाने सुरू ठेवली आहेत.

पीक विम्यापासून शेतकरी वंचित

बुलडाणा : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. आधीच शेतकरी संकटात सापडलेले असताना विम्याची रक्कम मिळाली नसल्याचे चित्र आहे.

राेजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी

डाेणगाव : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेला आहे. ग्रामीण भागात खरीप हंगाम संपल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. प्रशासनाने राेहयाेतून कामे सुरू करावीत, अशी मागणी हाेत आहे.

पांदण रस्त्याची कामे करण्याची मागणी

देऊळगाव मही : परिसरातील अनेक पांदण रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणीपूर्वी दुरुस्ती करण्याची गरज आहे.

संचारबंदीतही रेतीची अवैध वाहतूक सुरूच

देऊळगाव राजा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळातही रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. सर्वसामान्यांना संचारबंदी असताना दुसरीकडे रेतीची वाहने दिवसभर वाहतूक करतात.

ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ना आयसोलेशन!

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना हाेमक्वारंटाईन राहण्याची सूट देण्यात येते. ग्रामीण भागातही अनेक रुग्ण हाेम क्वारंटाईन असले तरी त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते गावभर फिरून काेराेनाचा प्रसार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे.

कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

सुलतानपूर : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम अद्याप जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.