शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

संततधार पावसामुळे पिकांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे ...

लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते, पूल वाहून गेले आहेत. सततच्या रिपरिपमुळे कापूस, ज्वारी, मका, बाजरी, उडीद, भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. टिटवी परिसरात २३ सप्टेंबर राेजी झालेल्या जाेरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने चार तास वाहतूक खाेळंबली हाेती.

लाेणार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी साेयाबीनची पेरणी केली आहे. सध्या साेयाबीन तयार झालेले असतानाच सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे साेयाबीनचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पेरणी झालेल्या कपाशीला कैऱ्या लागलेल्या आहेत. मात्र सततच्या पावसामुळे कैऱ्या सडत आहेत. फुटलेला कापूस पावसाच्या पाण्याने ओला होऊन काळा पडत आहे.

बाजरीचेही माेठ्या प्रमाणात नुकसान

कापणी केलेले बाजरीचे पीक पावसाच्या पाण्यामुळे धोक्यात आले आहे. कापलेल्या बाजरीला कोंब फुटत आहेत. उडदाच्या पक्क्या झालेल्या शेंगा पावसाच्या पाण्याने सडत आहेत. मका पिकावर अळी पडल्यामुळे या पिकाचे जवळपास नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णपणे काळे झाले होते. यावर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

लघुप्रकल्प, गाव तलाव ओव्हर फ्लाे

दमदार पावसामुळे तालुक्यातील टिटवी, शिवणीजाट, जांभूळ, गायखेड, हिरडव, गुंधा, देऊळगाव कुंडपाळ, तंबोला हे पाझर तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तालुक्यातील नाले खळखळ खळून वाहत आहेत. तसेच, मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.

कोट..

सतत तीन ते चार दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने काढणीसाठी आलेले उडदाचे पीक पूर्णपणे खराब झाले आहे. पाठोपाठ सोयाबीनसुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहे.

शेख एजाज खान, शेतकरी

अनेक गावांमध्ये पुराचा धाेका

गुरुवारी दुपारी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. टिटवी येथील पाझर तलाव ओव्हर फ्लाे झाल्यामुळे टिटवी गावालगत तब्बल चार ते पाच तास वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे पुलाच्या दाेन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. नदीकाठावरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सरपंच भगवानराव कोकाटे यांनी केली आहे.