शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे पिकांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे ...

लोणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस हाेत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे. ग्रामीण भागात अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते, पूल वाहून गेले आहेत. सततच्या रिपरिपमुळे कापूस, ज्वारी, मका, बाजरी, उडीद, भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. टिटवी परिसरात २३ सप्टेंबर राेजी झालेल्या जाेरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने चार तास वाहतूक खाेळंबली हाेती.

लाेणार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी साेयाबीनची पेरणी केली आहे. सध्या साेयाबीन तयार झालेले असतानाच सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे साेयाबीनचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पेरणी झालेल्या कपाशीला कैऱ्या लागलेल्या आहेत. मात्र सततच्या पावसामुळे कैऱ्या सडत आहेत. फुटलेला कापूस पावसाच्या पाण्याने ओला होऊन काळा पडत आहे.

बाजरीचेही माेठ्या प्रमाणात नुकसान

कापणी केलेले बाजरीचे पीक पावसाच्या पाण्यामुळे धोक्यात आले आहे. कापलेल्या बाजरीला कोंब फुटत आहेत. उडदाच्या पक्क्या झालेल्या शेंगा पावसाच्या पाण्याने सडत आहेत. मका पिकावर अळी पडल्यामुळे या पिकाचे जवळपास नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक पूर्णपणे काळे झाले होते. यावर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

लघुप्रकल्प, गाव तलाव ओव्हर फ्लाे

दमदार पावसामुळे तालुक्यातील टिटवी, शिवणीजाट, जांभूळ, गायखेड, हिरडव, गुंधा, देऊळगाव कुंडपाळ, तंबोला हे पाझर तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तालुक्यातील नाले खळखळ खळून वाहत आहेत. तसेच, मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.

कोट..

सतत तीन ते चार दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने काढणीसाठी आलेले उडदाचे पीक पूर्णपणे खराब झाले आहे. पाठोपाठ सोयाबीनसुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहे.

शेख एजाज खान, शेतकरी

अनेक गावांमध्ये पुराचा धाेका

गुरुवारी दुपारी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. टिटवी येथील पाझर तलाव ओव्हर फ्लाे झाल्यामुळे टिटवी गावालगत तब्बल चार ते पाच तास वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे पुलाच्या दाेन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. नदीकाठावरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सरपंच भगवानराव कोकाटे यांनी केली आहे.