शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे ...

शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकतर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नाही, दुसरीकडे कर्ज काढून उसने पैसे घेऊन पेरणी केली, तर असेच आभाळाची उष्णता व कोरडे वारे वाहत राहिले तर काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हवामान खात्यावर शेतकऱ्यांचा रोष

यंदा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; परंतु परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा फोल ठरल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.

१२ दिवसांपासून पाऊसच नाही

पावसाअभावी पिके सुकू लागली,

यावर्षी खरीप हंगाम लागताच शेतकरी वर्गाला पेरणी करण्यासाठी पाहिजे तसा पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांत दोन वेळेस पाऊस झाल्याने शेतकऱ्याने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस लागवड केली, पण बारा दिवस झाले पावसाचा पत्ता नाही.

या भागातील पिके धोक्यात

सिदंखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी, शेलगाव राऊत, पिंपळगाव लेंडी, पांगरी, उमरद, विजोरा, साठेगाव, हिवरखेड पूर्णा, राहेरी बु., राहुरी खुर्द, दुसरबीड, जऊळका वाघजाई या परिसरात पावसाने दांडी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. उष्ण तापमानाने सोयाबीन व कापूस पीक जळण्याची भीती आहे.

काय म्हणतात शेतकरी...

जून महिन्यात शेवटी आमच्या भागात एकदाच पाऊस झाला. त्यानंतर आज १२ ते १३ दिवस झाले पाऊसच नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

एकनाथराव देशमुख,

राहेरी बु. शेतकरी.

पाऊस नसल्यामुळे राहेरी, ताडशिवणी परिसरात पेरणी धोक्यात सापडली आहे. जमिनीतून अंकुरच वर आले नाही. आम्हाला दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. तरी आम्हाला शासनाने बियाणे उपलब्ध करून द्यावे.

शेषराव देशमुख, ताडशिवणी शेतकरी.