शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे ...

शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नाही त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकतर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नाही, दुसरीकडे कर्ज काढून उसने पैसे घेऊन पेरणी केली, तर असेच आभाळाची उष्णता व कोरडे वारे वाहत राहिले तर काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

हवामान खात्यावर शेतकऱ्यांचा रोष

यंदा राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; परंतु परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा फोल ठरल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.

१२ दिवसांपासून पाऊसच नाही

पावसाअभावी पिके सुकू लागली,

यावर्षी खरीप हंगाम लागताच शेतकरी वर्गाला पेरणी करण्यासाठी पाहिजे तसा पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांत दोन वेळेस पाऊस झाल्याने शेतकऱ्याने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ऊस लागवड केली, पण बारा दिवस झाले पावसाचा पत्ता नाही.

या भागातील पिके धोक्यात

सिदंखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी, शेलगाव राऊत, पिंपळगाव लेंडी, पांगरी, उमरद, विजोरा, साठेगाव, हिवरखेड पूर्णा, राहेरी बु., राहुरी खुर्द, दुसरबीड, जऊळका वाघजाई या परिसरात पावसाने दांडी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. उष्ण तापमानाने सोयाबीन व कापूस पीक जळण्याची भीती आहे.

काय म्हणतात शेतकरी...

जून महिन्यात शेवटी आमच्या भागात एकदाच पाऊस झाला. त्यानंतर आज १२ ते १३ दिवस झाले पाऊसच नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

एकनाथराव देशमुख,

राहेरी बु. शेतकरी.

पाऊस नसल्यामुळे राहेरी, ताडशिवणी परिसरात पेरणी धोक्यात सापडली आहे. जमिनीतून अंकुरच वर आले नाही. आम्हाला दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही. तरी आम्हाला शासनाने बियाणे उपलब्ध करून द्यावे.

शेषराव देशमुख, ताडशिवणी शेतकरी.