शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मनरेगा योजनेला कृषी क्षेत्राशी जोडा - जाधव

By admin | Updated: July 21, 2016 00:51 IST

लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी खा. जाधव यांनी उपस्थित केला मुद्दा.

बुलडाणा : सलग दोन वर्ष दुष्काळाशी महाराष्ट्र सामना करतोय. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबायला तयार नाही. अनेक उपाययोजना शासन राबवतय, मात्र मुळापर्यंंत मदतीचा ओघ कमी पडतोय. यासाठी मनरेगा अर्थात ह्यमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाह्ण कृषी क्षेत्राशी जोडण्याची आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी २0 जुलैला लोकसभेत केली. राजधानी दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शेती व्यवस्थेशी नाळ जुळलेली असल्यामुळे कायम शेतकरी आणि त्याचे जीवनमान याबाबत खा. प्रतापराव जाधव आग्रही भूमिका घेत आहेत. आजही लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी मनरेगासारखा १00 दिवसांचा रोजगार उपलब्धीची योजना कृषी क्षेत्रात जोडण्याचे अभ्यासपूर्ण विवेचन खा. जाधव यांनी केले. यावेळी ते म्हणाले, की ग्रामीण भागातील अकुशल लोकांना १00 दिवसांचा रोजगार देण्यासाठी मनरेगा काम करते. कमीतकमी १00 दिवसांचा रोजगार न मिळाल्यास घरबसल्या मजुरीची व्यवस्थादेखील या योजनेतून आहे. दुर्दैवाने बिहार, यूपी, राजस्थान व इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या शेतकरी आत्महत्येचे लोन पसरलेल्या राज्यात मनरेगाचा खर्च २५ टक्क्यापेक्षाही कमी आहे. पाहिजे तेवढी रोजगार उपलब्धी झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना गावपातळीवर काम मिळत नाही. पर्यायाने हाताला काम शोधत ग्रामीण जनतेचे लोंढेच्या लोंढे शहराकडे धाव घेत आहेत. शेतीला मनरेगाची जोड दिल्यास कृषी क्षेत्रात अकुशल लोकांना गावपातळीवरच रोजगार उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे अकुशल लोकांना रोजगार देणारी सगळय़ात मोठी व्यवस्था कृषी क्षेत्रात उपलब्ध आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे. या योजनेला शेतीची जोड दिल्यास शेतकर्‍यांचा लाग-लागवड खर्च कमी होईल. उत्पन्न वाढण्यासही मदत होईल आणि अकुशल लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने मनरेगाचा हेतूदेखील चांगल्या अर्थाने सफल होईल. आज शेतात मजूर मिळत नाहीत. मनरेगामुळे गावातच काम आणि १00 दिवसांची हमी, असा योग साधून शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीमुळे आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल, असा मुद्दा खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत मांडला. मनरेगासारखी देशपातळीवरील कोट्यवधींचा निधी उपलब्ध असलेली योजना कृषी क्षेत्राशी जोडल्यास संपूर्ण देशभरात शेतकरी, शेतमजूर सुखावला जाईल, असेही यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले.