शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा योजनेला कृषी क्षेत्राशी जोडा - जाधव

By admin | Updated: July 21, 2016 00:51 IST

लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी खा. जाधव यांनी उपस्थित केला मुद्दा.

बुलडाणा : सलग दोन वर्ष दुष्काळाशी महाराष्ट्र सामना करतोय. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबायला तयार नाही. अनेक उपाययोजना शासन राबवतय, मात्र मुळापर्यंंत मदतीचा ओघ कमी पडतोय. यासाठी मनरेगा अर्थात ह्यमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाह्ण कृषी क्षेत्राशी जोडण्याची आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी २0 जुलैला लोकसभेत केली. राजधानी दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शेती व्यवस्थेशी नाळ जुळलेली असल्यामुळे कायम शेतकरी आणि त्याचे जीवनमान याबाबत खा. प्रतापराव जाधव आग्रही भूमिका घेत आहेत. आजही लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी मनरेगासारखा १00 दिवसांचा रोजगार उपलब्धीची योजना कृषी क्षेत्रात जोडण्याचे अभ्यासपूर्ण विवेचन खा. जाधव यांनी केले. यावेळी ते म्हणाले, की ग्रामीण भागातील अकुशल लोकांना १00 दिवसांचा रोजगार देण्यासाठी मनरेगा काम करते. कमीतकमी १00 दिवसांचा रोजगार न मिळाल्यास घरबसल्या मजुरीची व्यवस्थादेखील या योजनेतून आहे. दुर्दैवाने बिहार, यूपी, राजस्थान व इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या शेतकरी आत्महत्येचे लोन पसरलेल्या राज्यात मनरेगाचा खर्च २५ टक्क्यापेक्षाही कमी आहे. पाहिजे तेवढी रोजगार उपलब्धी झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना गावपातळीवर काम मिळत नाही. पर्यायाने हाताला काम शोधत ग्रामीण जनतेचे लोंढेच्या लोंढे शहराकडे धाव घेत आहेत. शेतीला मनरेगाची जोड दिल्यास कृषी क्षेत्रात अकुशल लोकांना गावपातळीवरच रोजगार उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे अकुशल लोकांना रोजगार देणारी सगळय़ात मोठी व्यवस्था कृषी क्षेत्रात उपलब्ध आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे. या योजनेला शेतीची जोड दिल्यास शेतकर्‍यांचा लाग-लागवड खर्च कमी होईल. उत्पन्न वाढण्यासही मदत होईल आणि अकुशल लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने मनरेगाचा हेतूदेखील चांगल्या अर्थाने सफल होईल. आज शेतात मजूर मिळत नाहीत. मनरेगामुळे गावातच काम आणि १00 दिवसांची हमी, असा योग साधून शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीमुळे आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल, असा मुद्दा खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत मांडला. मनरेगासारखी देशपातळीवरील कोट्यवधींचा निधी उपलब्ध असलेली योजना कृषी क्षेत्राशी जोडल्यास संपूर्ण देशभरात शेतकरी, शेतमजूर सुखावला जाईल, असेही यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले.