शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा योजनेला कृषी क्षेत्राशी जोडा - जाधव

By admin | Updated: July 21, 2016 00:51 IST

लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी खा. जाधव यांनी उपस्थित केला मुद्दा.

बुलडाणा : सलग दोन वर्ष दुष्काळाशी महाराष्ट्र सामना करतोय. शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबायला तयार नाही. अनेक उपाययोजना शासन राबवतय, मात्र मुळापर्यंंत मदतीचा ओघ कमी पडतोय. यासाठी मनरेगा अर्थात ह्यमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाह्ण कृषी क्षेत्राशी जोडण्याची आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी २0 जुलैला लोकसभेत केली. राजधानी दिल्ली येथे लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शेती व्यवस्थेशी नाळ जुळलेली असल्यामुळे कायम शेतकरी आणि त्याचे जीवनमान याबाबत खा. प्रतापराव जाधव आग्रही भूमिका घेत आहेत. आजही लोकसभेत शून्य प्रहराच्यावेळी मनरेगासारखा १00 दिवसांचा रोजगार उपलब्धीची योजना कृषी क्षेत्रात जोडण्याचे अभ्यासपूर्ण विवेचन खा. जाधव यांनी केले. यावेळी ते म्हणाले, की ग्रामीण भागातील अकुशल लोकांना १00 दिवसांचा रोजगार देण्यासाठी मनरेगा काम करते. कमीतकमी १00 दिवसांचा रोजगार न मिळाल्यास घरबसल्या मजुरीची व्यवस्थादेखील या योजनेतून आहे. दुर्दैवाने बिहार, यूपी, राजस्थान व इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या शेतकरी आत्महत्येचे लोन पसरलेल्या राज्यात मनरेगाचा खर्च २५ टक्क्यापेक्षाही कमी आहे. पाहिजे तेवढी रोजगार उपलब्धी झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना गावपातळीवर काम मिळत नाही. पर्यायाने हाताला काम शोधत ग्रामीण जनतेचे लोंढेच्या लोंढे शहराकडे धाव घेत आहेत. शेतीला मनरेगाची जोड दिल्यास कृषी क्षेत्रात अकुशल लोकांना गावपातळीवरच रोजगार उपलब्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे अकुशल लोकांना रोजगार देणारी सगळय़ात मोठी व्यवस्था कृषी क्षेत्रात उपलब्ध आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे. या योजनेला शेतीची जोड दिल्यास शेतकर्‍यांचा लाग-लागवड खर्च कमी होईल. उत्पन्न वाढण्यासही मदत होईल आणि अकुशल लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने मनरेगाचा हेतूदेखील चांगल्या अर्थाने सफल होईल. आज शेतात मजूर मिळत नाहीत. मनरेगामुळे गावातच काम आणि १00 दिवसांची हमी, असा योग साधून शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीमुळे आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल, असा मुद्दा खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत मांडला. मनरेगासारखी देशपातळीवरील कोट्यवधींचा निधी उपलब्ध असलेली योजना कृषी क्षेत्राशी जोडल्यास संपूर्ण देशभरात शेतकरी, शेतमजूर सुखावला जाईल, असेही यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले.