शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात शाळांमध्ये लागणार तक्रारपेट्या!

By admin | Updated: May 8, 2017 02:20 IST

खामगावातील तक्रारपेट्या उपक्रमाची शासनाकडून दखल.

खामगाव (जि. बुलडाणा) : दिल्ली येथील निर्भया प्रकरणानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देशभरात ऐरणीवर आला असताना महिला व मुलींना आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध नाव न सांगता दाद मागता यावी, यासाठी तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी ५ वर्षांपूर्वीच खामगाव शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावून तक्रारी निवारणाचा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची आता शासनानेही दखल घेतली असून, राज्यभरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावण्याचे ५ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्देश दिले आहेत.राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याची आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात येणार आहे. यामध्ये शाळांना शाळांमध्ये दर्शनी भागावर पुरेशा मापाची तक्रारपेटी सुरक्षित जागेवर लावावी लागणार आहे. आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ही तक्रारपेटी मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडावी लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पोलीस पाटील आहेत अशा ठिकाणी पोलीस पाटलांची सेवा घ्यावी लागणार आहे. यामध्ये गंभीर, संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारीबाबत पोलीस यंत्रणांचे सहाय्य उपलब्ध होणार आहे. तक्रारपेटीमध्ये प्राप्त होणार्‍या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन, प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्य आहे त्याबाबत तत्काळ शाळा प्रशासन स्तरावर कार्यवाही करावी लागणार आहे. तर ज्या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही, मार्गदर्शन अपेक्षित असेल तेथे योग्य त्या स्तरावर तक्रारींच्या प्रतीसह संदर्भ करण्यात यावा. शाळेतील महिला शिक्षक, विद्यार्थिनी यांच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवाव्या लागणार आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवाव्या लागणार आहेत. या समित्यांना अशा तक्रारी सर्वात प्रथम विचारात घेऊन त्याबाबत योग्य ते निर्देश द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य दक्षता घेण्याचे निर्देशसुद्धा संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना!शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ही ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम खामगावसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ५ वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी सुरू केला होता. पोलीस प्रशासनामार्फत पत्रकार, मुख्याध्यापक आदींच्या उपस्थितीत दर आठवड्यात शहरातील शाळांसमोर लावलेल्या तक्रारपेट्या उघडून त्या तक्रारींची सत्यता पडताळून कार्यवाही करण्यात येत होती. नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून एका कुमारिकेने आत्महत्येचा विचारसुद्धा मनात आणला होता; मात्र नाव गुप्त राहून तिच्या तक्रारीचे निवारण झाल्याने या तक्रार पेट्यांची उपयोगिता वाढली होती.सर्वच शाळांमध्ये बसविणार तक्रारपेटी! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी जिलतील मोजक्याच शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिलतील १ हजार ४४८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ७७७ खाजगी शाळा, १0७ नगर परिषदेच्या शाळांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने बंधनकारक केले आहे.यापूर्वी काहीच शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे बंधनकारक झाले असून, नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरू होताच तक्रार पेट्या बसविण्यात येतील. - एन. के. देशमुख,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा