शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राज्यभरात शाळांमध्ये लागणार तक्रारपेट्या!

By admin | Updated: May 8, 2017 02:20 IST

खामगावातील तक्रारपेट्या उपक्रमाची शासनाकडून दखल.

खामगाव (जि. बुलडाणा) : दिल्ली येथील निर्भया प्रकरणानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देशभरात ऐरणीवर आला असताना महिला व मुलींना आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध नाव न सांगता दाद मागता यावी, यासाठी तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी ५ वर्षांपूर्वीच खामगाव शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावून तक्रारी निवारणाचा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची आता शासनानेही दखल घेतली असून, राज्यभरातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावण्याचे ५ मे रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्देश दिले आहेत.राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेट्या बसविण्याची आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात येणार आहे. यामध्ये शाळांना शाळांमध्ये दर्शनी भागावर पुरेशा मापाची तक्रारपेटी सुरक्षित जागेवर लावावी लागणार आहे. आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ही तक्रारपेटी मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडावी लागणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पोलीस पाटील आहेत अशा ठिकाणी पोलीस पाटलांची सेवा घ्यावी लागणार आहे. यामध्ये गंभीर, संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारीबाबत पोलीस यंत्रणांचे सहाय्य उपलब्ध होणार आहे. तक्रारपेटीमध्ये प्राप्त होणार्‍या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे. ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन, प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्य आहे त्याबाबत तत्काळ शाळा प्रशासन स्तरावर कार्यवाही करावी लागणार आहे. तर ज्या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही, मार्गदर्शन अपेक्षित असेल तेथे योग्य त्या स्तरावर तक्रारींच्या प्रतीसह संदर्भ करण्यात यावा. शाळेतील महिला शिक्षक, विद्यार्थिनी यांच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवाव्या लागणार आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींवरील अत्याचाराबाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवाव्या लागणार आहेत. या समित्यांना अशा तक्रारी सर्वात प्रथम विचारात घेऊन त्याबाबत योग्य ते निर्देश द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य दक्षता घेण्याचे निर्देशसुद्धा संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना!शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत ही ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम खामगावसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ५ वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी सुरू केला होता. पोलीस प्रशासनामार्फत पत्रकार, मुख्याध्यापक आदींच्या उपस्थितीत दर आठवड्यात शहरातील शाळांसमोर लावलेल्या तक्रारपेट्या उघडून त्या तक्रारींची सत्यता पडताळून कार्यवाही करण्यात येत होती. नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून एका कुमारिकेने आत्महत्येचा विचारसुद्धा मनात आणला होता; मात्र नाव गुप्त राहून तिच्या तक्रारीचे निवारण झाल्याने या तक्रार पेट्यांची उपयोगिता वाढली होती.सर्वच शाळांमध्ये बसविणार तक्रारपेटी! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी जिलतील मोजक्याच शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिलतील १ हजार ४४८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ७७७ खाजगी शाळा, १0७ नगर परिषदेच्या शाळांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने बंधनकारक केले आहे.यापूर्वी काहीच शाळांमध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे बंधनकारक झाले असून, नवीन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरू होताच तक्रार पेट्या बसविण्यात येतील. - एन. के. देशमुख,प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा