शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीपिकांना भरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

चिखली : जिल्ह्यात १८ व १९ मार्च रोजी अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक ...

चिखली : जिल्ह्यात १८ व १९ मार्च रोजी अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक गारपीट देखील झाली. यामुळे ऐन काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतीवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी देखील खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच बोगस बियाणे यामुळे दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी रब्बीतील पिके चांगली असल्याने याच पिकांकडून शेतकºयांना आशा होती. गहू, हरबरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह इतर पिके ऐन काढणीला आलेली असताना जिल्हयात १८ व १९ मार्च रोजी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना या नुकसानाची भरपाई न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे हतबल होऊन आत्महत्येचा मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. या कठीण परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी तातडीने नुकसानाचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

नुकसानाची पाहणी

‘स्वाभिमानी’चे राणा चंदन, शेख रफिक शेख करीम, राजेश गवई, महेंद्र जाधव, संतोष गवळी या पदाधिकाºयांनी मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. राणा चंदन यांनी तात्काळ मोताळा तहसीलदार समाधान सोनुने यांना फोन करून पंचनामे करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कृषी अधिकारी, तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करण्यास सुरवात केली. दरम्यान, बाबुराव सोनुने यांच्या शेतातील अडीच एकर मका उद्ध्व‌स्त झाल्याने त्यांना धीर दिला.