शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:42 IST

हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप चिखली : लुधियाना येथे कर्तव्यावर असताना परेडदरम्यान निधन झालेल्या चिखलीचे वीर सुपुत्र श्याम प्रकाश शिंदे ...

हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

चिखली : लुधियाना येथे कर्तव्यावर असताना परेडदरम्यान निधन झालेल्या चिखलीचे वीर सुपुत्र श्याम प्रकाश शिंदे यांना ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.

स्थानिक जुने गाव परिसरातील अंधारा महादेव मंदिर परिसरातील शहीद जवान श्याम प्रकाश शिंदे लुधियाना येथे ते कार्यरत होते होते. ७ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेच्या सुमारास अकस्मातपणे चक्कर येऊन ते खाली कोसळले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, लष्करी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शहीद श्याम शिंदे यांचे पार्थिव ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. याठिकाणी शहीद शिंदे यांच्या पत्नी स्वाती श्याम शिंदे, आई कावेरीबाई आणि अवघ्या ११ वर्षांचा अनिरुद्ध व सहा वर्षांचा देवांश ही दोन मुलं यांनी टाहो फोडताच उपस्थित कुटुंबीय, आप्त-स्वकीय आणि मित्रपरिवाराचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी जुनेगाव स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यावेळी माजी आ. राहुल बोंद्रे, नगराध्यक्ष प्रिया व कुणाल बोंद्रे, उपाध्यक्षा वजीराबी व शे. अनिस, प. सं. सभापती सिंधू तायडे, अंकुशराव पडघान, प्रा. नरेंद्र खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, रामदास देव्हडे, पंडितराव देशमुख, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, गोपाल देव्हडे, नामू गुरूदासाणी, संजय अतार, सुदर्शन भालेराव, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, ठाणेदार अशोक लांडे, मुख्याधिकारी सुरडकर यांनी पुष्पचक्र वाहून शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद शिंदे यांचे मोठे बंधू अनंता शिंदे यांनी पार्थिवाला अग्नी दिला.

--पहिल्याच प्रयत्नात झाले होते सैन्यात दाखल--

२४ जून १९८५ ला जन्मलेले जुने गाव परिसरातील वीर जवान श्याम प्रकाश शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण स्थानिक आदर्श विद्यालयात पूर्ण केले होते. शालेय जीवनापासूनच सैन्यदलात दाखल होण्याचे त्यांचे स्वप्न होते. कठोर परिश्रमाच्या जोरावर २००४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते सैन्यदलात दाखल झाले होते. १५ दिवसांपूर्वी ते जम्मू येथून बदली झाल्याने लुधियानाजवळील भटिंडा येथे आले होते. येथे ७ सप्टेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकहून परतल्यानंतर वर्कशॉपमध्ये चक्कर येऊन ते खाली कोसळले त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई कावेरीबाई, पत्नी स्वाती, दोन मुले, भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे.