शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हुंड्यासाठी लग्न मोडणा-या वर मंडळीवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 6, 2015 00:25 IST

बुलडाणा जिल्हय़ातील कोल्ही गोल्हर येथील घटना.

धामणगाव बढे (मातोळा, जि. बुलडाणा): मागितलेला हुंडा वधूपक्षाकडून न मिळाल्यामुळे वरपक्षाने लग्न मोडल्याचा प्रकार मोताळा तालुक्यातील कोल्ही गोल्हर गावात ४ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी वधूपित्याने धामणगाव बढे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वरासह त्याचे वडील व भाऊ तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मोताळा तालुक्यातील कोल्ही गोल्हर येथील सुपडा नामदेव वाघोदे यांच्या मुलीचा विवाह जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील राजूर येथील वसंत आनंदा तायडे यांचा मुलगा विजय याच्याशी निश्‍चित झाला होता. त्यानुसार विवाह समारंभ ४ जानेवारी रोजी कोल्ही गोल्हर येथे पार पडणार होता; परंतु वराकडील मंडळीने ३ जानेवारी रोजी हुंड्याच्या रकमेची मागणी केली. तर ४ जानेवारी रोजी विवाह मुहूर्तापर्यंत वरपक्षाची वरात वधूमंडपी न आल्याने आपली हुंड्यापायी फसवणूक झाल्याचे वधूपित्याचे लक्षात आले. यामुळे वधूपिता सुपडा नामदेव वाघोदे रा. कोल्ही गोल्हर यांनी ४ जानेवारी रोजी रात्री धामणगाव बढे पोलीस स्टेशनला तक्रारी दिली. तक्रारीत नमूद आहे की, वर पक्षाने साडेचार लाख रुपये हुंड्याची मागणी लग्नापूर्वी केली होती. एवढे पैसे देण्याची ऐपत नसल्यामुळे सदर मागणी वधूपित्याकडून पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे ४ जानेवारी रोजी वर मंडळीकडून लग्नाची वरात वधूमंडपी न आल्यामुळे विवाह सोहळा होऊ शकला नाही. या तक्रारीच्या आधारे धामणगाव बढे पोलिसांनी वर विजय वसंत तायडे, त्याचे वडील वसंत आनंदा तायडे व भाऊ संजय तायडे या तिघांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक विरोधी कायदा कलम ४ नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.