शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

बोंद्रे करताहेत शेतकऱ्यांची दिशाभूल- महाले

By admin | Updated: June 3, 2017 00:25 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा आक्रमक : बाजार समिती सचिवांना विचारला जाब!

चिखली : तूर खरेदीतील अनियमितता, कृषी मंत्र्यांनी दिलेला स्थगनादेश डावलून कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मार्केट यार्डात शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या कास्तकारांची बाजार समिती संचालक व कर्मचाऱ्यांची संगनमताने होणारी लूट अश्या पद्धतीचे घाणेरडे राजकारण आ. राहुल बोंद्रे यांच्या इशाऱ्यावर चिखली बाजार समितीत सुरू असून, स्वत:च्या राजकीय लाभासाठी स्टंटबाजी करणारे आ.बोंद्रे हे राज्य व केंद्र सरकारची बदनामी आणि जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांनी केला. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडून ते प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १ जून रोजी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांनी आ.राहुल बोंद्रे व बाजार समिती संचालकांवर हे आरोप केले. दरम्यान श्वेता महाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.विजय कोठारी यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अजय मिरकड यांना घेराव घालून जाब विचारला. महाराष्ट्र शासनाकडून सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते; परंतु बुलडाणा जिल्ह्यात या महत्त्वपूर्ण योजनेची अद्याप अंमलबजावणी सुरू झाली नाही. चिखली बाजार समितीमार्फत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादीच शासनापर्यंत न पोहोचल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असा आरोप करीत सदर यादी शासनाकडे अद्याप का पोहोचली नाही, याबाबत बाजार समितीचे सचिव अजय मिरकड यांना धारेवर धरले. तसेच राज्य सरकारकडून प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले जात असताना केवळ चिखली बाजार समितीचा अक्षम्य हलगर्जीपणा व घाणेरड्या राजकारणामुळे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत आहेत, असा आरोपदेखील भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी केला, तसेच शेतमाल तारण योजनादेखील चिखली बाजार समितीने राबवली नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवित असताना चिखली बाजार समितीमध्ये मात्र राजकीय हेतूने या योजनांची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्वेता महाले पाटील यांनी बाजार समिती प्रशासनाला यावेळी दिला. यावेळी बाजार समितीचे संचालक काशिनाथ बोंद्रे, अ‍ॅड. मंगेश व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय चेके पाटील, स्वप्नील गुप्ता, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्र पांडे, संचालक विकास डाळीमकर, न.प.सभापती सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, नगरसेवक पंडितराव देशमुख, प्रा. राजू गवई, गोपाल देव्हडे, शेख अनिस, हनुमंत भवर, डिगांबर राऊत, शिवराज पाटील, नारायणराव भवर, चेतन देशमुख, अनमोल ढोरे, रमेश आकाळ, बलदेविसंग सपकाळ, राजेंद्र हरपाळे, विकास मोरे, अनिल अंभोरे, यासह पटेल, संतोष काळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.लेखी आश्वासन व स्थळ पंचनामाबाजार समितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी सोयाबीन अनुदान योजनेतील दिरंगाई, तूर खरेदीतील अनियमितता, शेतमाल तारण योजनेला बसणारा खो, कास्तकारांची लूट यावर जाब विचारण्यासह बाजार समितीचे सचिव मिरकड यांच्याकडून सोयाबीन अनुदान योजनेसंबंधीची यादी तातडीने शासनाकडे सादर करण्याचे लेखी घेतल्यानंतर सभापती श्वेता महाले पाटील यांनी तहसीलदार मनीष गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. तहसीलदार गायकवाड यांनी तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील प्रभारी गारोळे यांना लगोलग पाचारण केले असता, अधिकारी वर्गासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एमआयडीसी स्थित टीएमसी मार्केट यार्डातील तूर खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी व पंचनामा करण्यात आला. या केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेली संपूर्ण तूर शासनाने नाफेड मार्फत खरेदी केली असून, येथे खरेदीविना तूर आढळली नसल्याचे प्रमाणपत्र सहकार उपनिबंधक कार्यालयाने दिले आहे.