शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर!

By admin | Updated: July 12, 2016 00:22 IST

पावसामुळे झाले जनजीवन विस्कळीत; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली.

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. खामगाव, नांदुरा, व सिंदखेड राजा तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सततच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंंत पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या या पावसामुळे सोमवारी अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती, तर काही शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांंनी अघोषित सुटी दिली. संततधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामेही बंद होती. रविवार व सोमवारला सकाळी काही भागात, तर दुपारी काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता. जिल्ह्यात नांदुरा व खामगाव व सिंदखेड तालुक्यात अतवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद करण्यात आली. यात बुलडाणा तालुक्यात ५८ मिमी, चिखली ३२ मिमी, देऊळगाव राजा ४७ मिमी, मेहकर ४0 मिमी, लोणार ४३ मिमी, सिंदखेड राजा ६६ मिमी, मलकापूर ४१ मिमी, मोताळा ५७ मिमी, नांदुरा ७२ मिमी, खामगाव ६७ मिमी, शेगाव ६२ मिमी, जळगाव जामोद ५४ मिमी आणि संग्रामपूर तालुक्यात ६३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाची सरासरी २0.१ मि.मी आहे. दिवसभर पाऊस झाल्याने सर्वच तालुक्यात पावसाची आकडेवारी वाढणार आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. त्याची सरासरी १६२.२ मि.मी. आहे. पावसाची नोंद करण्यात आली. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६९६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी ५३.५ मि.मी आहे. आतापर्यंंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंंत पडलेल्या पावसाची सरासरी २४0.८ मि.मी आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळीही वाढत आहे. नळगंगा प्रकल्पात ४.३९ टक्के जलसाठा असून, पेनटाकळी - ३.९१ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात मृत जलसाठा असून, मध्यम प्रकल्प असलेले पलढग - ३.६0 टक्के, ज्ञानगंगा - १६.३१ टक्के, मस - ८.२ टक्के, कोराडी - १.७८ टक्के, मन - १२.६६ टक्के, तोरणा - ४.७२ टक्के, उतावळी - ८.४0 टक्के जलसाठा आहे.बाजारपेठ ठप्प रविवार व सोमवारी दिवसभर पाऊस असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठ ठप्प होती. नागरिक केवळ काही कामानिमित्तच बाहेर निघाले. सोमवारी दिवसभर बुलडाणा, खामगाव, लोणार, शेगाव येथील बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ग्राहकच नसल्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.