शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर!

By admin | Updated: July 12, 2016 00:22 IST

पावसामुळे झाले जनजीवन विस्कळीत; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली.

बुलडाणा : जिल्ह्यामध्ये गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. खामगाव, नांदुरा, व सिंदखेड राजा तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सततच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंंत पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या या पावसामुळे सोमवारी अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती, तर काही शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांंनी अघोषित सुटी दिली. संततधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामेही बंद होती. रविवार व सोमवारला सकाळी काही भागात, तर दुपारी काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता. जिल्ह्यात नांदुरा व खामगाव व सिंदखेड तालुक्यात अतवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद करण्यात आली. यात बुलडाणा तालुक्यात ५८ मिमी, चिखली ३२ मिमी, देऊळगाव राजा ४७ मिमी, मेहकर ४0 मिमी, लोणार ४३ मिमी, सिंदखेड राजा ६६ मिमी, मलकापूर ४१ मिमी, मोताळा ५७ मिमी, नांदुरा ७२ मिमी, खामगाव ६७ मिमी, शेगाव ६२ मिमी, जळगाव जामोद ५४ मिमी आणि संग्रामपूर तालुक्यात ६३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाची सरासरी २0.१ मि.मी आहे. दिवसभर पाऊस झाल्याने सर्वच तालुक्यात पावसाची आकडेवारी वाढणार आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. त्याची सरासरी १६२.२ मि.मी. आहे. पावसाची नोंद करण्यात आली. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६९६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी ५३.५ मि.मी आहे. आतापर्यंंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंंत पडलेल्या पावसाची सरासरी २४0.८ मि.मी आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळीही वाढत आहे. नळगंगा प्रकल्पात ४.३९ टक्के जलसाठा असून, पेनटाकळी - ३.९१ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात मृत जलसाठा असून, मध्यम प्रकल्प असलेले पलढग - ३.६0 टक्के, ज्ञानगंगा - १६.३१ टक्के, मस - ८.२ टक्के, कोराडी - १.७८ टक्के, मन - १२.६६ टक्के, तोरणा - ४.७२ टक्के, उतावळी - ८.४0 टक्के जलसाठा आहे.बाजारपेठ ठप्प रविवार व सोमवारी दिवसभर पाऊस असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठ ठप्प होती. नागरिक केवळ काही कामानिमित्तच बाहेर निघाले. सोमवारी दिवसभर बुलडाणा, खामगाव, लोणार, शेगाव येथील बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ग्राहकच नसल्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.