शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:35 IST

बुलडाणा : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त ...

बुलडाणा : दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला याेजनेेअंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच 'बजेट" कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र सिलिंडरच्या दरात हाेत असलेली वाढ लाभार्थींसाठी डोकेदुखी ठरत आहे.

गरिबांच्या आवाक्याबाहेर सिलिंडरचे दर

उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसिडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसिडी मिळत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते.

जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचले, त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ५० रुपयांवर पोहचले आहेत.

उज्ज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने खूप आनंद आला होता. मात्र, सिलिंडर महाग झाल्याने आता तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यासारख्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसिडी वाढवण्याची गरज आहे.

- भारती बाहेकर, किन्हाेळा

गत काही महिन्यांपासून महागाई माेठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दरररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागविताना नाकीनऊ येत आहेत. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

-सारिका महाकाळ

आपल्याला गॅस मिळाला, याचा मोठा आनंद झाला, काही दिवस त्याचा वापर केला. मात्र वर्षभरापासून सिलिंडरचे वाढते दर न परवडणारे आहेत. सिलिंडर भरणे परवडत नसून ते न वापरलेलेच बरे, या विचाराने गॅस वापरणे बंद केले आहे. काेराेनामुळे आधीच सहा महिने लाॅकडाऊन हाेते. त्यातच शेतीचा हंगामही संपला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात असताना गॅसचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. - वैष्णवी जाधव, बुलडाणा

दररोज मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह केला जातो. मात्र आता महागाई आवाक्याबाहेर जात असताना गॅस सिलिंडरचेही दर वाढल्याने त्याचा वापर न केलेलाच बरा, असे सर्वांनाच वाटत आहे. ग्रामीण भागात सरपण मिळते. त्यामुळे गॅसचा वापर कमी करून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. दर कमी करण्याची गरज आहे.

-अश्विनी मिसाळ, बुलडाणा

मध्यंतरी सिलिंडरचे दर कमी झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता. त्यामुळे आता मिळालेल्या गॅसचा आपल्यालाही वापर करता येईल, याचा आनंद झाला होता. मात्र गॅस सिलिंडरचे वाढते दर पाहता सिलिंडर वापरणे शक्य होत नाही. जवळपास ८०० रुपयांवर गॅसचे दर गेले आहेत. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागणार आहे.

-रेखा सुसर, शिरपूर