देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : केंद्र व राज्य सरकारच्या विकासांतर्गत निर्माण होणार्या मुंबई-नागपूर हा जलदगती मार्ग सिंदखेडराजापासून मेहकरपर्यंत जुन्याच मार्गाने जोडण्यात यावा, तसेच स्मार्ट सिटीचे प्रस्तावित ठिकाण बदलण्याच्या मागणीसाठी भारिप -बमसंचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात यांनी मंगळवारी देऊळगाव राजा व बुधवारी बुलडाण्यात निदर्शने केली.महामार्ग हा नवीन रस्त्यावर प्रस्तावित असल्याने या भागातील जनता व प्रामुख्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. नियोजित रस्त्यावरच हा महामार्ग झाला, तर शेकडो शेतकरी भूमिहिन होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील. जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवराला डावलून हा महामार्ग झाला तर लोणार तालुका पूर्णपणे अविकसित होणार आहे. या सर्व बाबींचा जनहिताच्या दृष्टीने विचार करता, सध्या सुरू असलेल्या सिंदखेडराजा, किनगावराजा, राहेरी दुसरबीड, बिबी, सुलतानपूर, मेहकर डोणगाव या मार्गाने नवीन जलदगती मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात यावा. याबाबत केंद्र व राज्य सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास जनहितासाठी लढा उभारण्याचा इशारा जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदनात दिला आहे.यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष भाई दिलीप खरात, अँड.रवींद्र डोंगरदिवे, अँड.धुरंधर, आलम, रशीद, काझी, गौतम कासारे, राहुल खरात, राहुल राज साळवे, भीमराव सिरसाट, नारायण इंगळे, बंटी खरात, अमोल झिने, दीपक सोनपसारे, बबन खरात यावेळी हजर होते.
भारिप-बमसंची निदर्शने
By admin | Updated: June 23, 2016 23:32 IST