शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहा-राजरत्न आंबेडकर

By admin | Updated: October 24, 2016 02:38 IST

बुलडाणा येथे भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम संपन्न झाला.

बुलडाणा, दि. २३- भारताच्या राजकारणात अनेक पक्ष आहेत. बाबासाहेबांच्या जीवनकाळात महात्मा गांधींच्या दबावामुळे पुणे करार करावा लागला. आज घडीला तीच परिस्थिती देशातल्या बौद्ध बांधवांवर लादण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र बौद्ध बांधवांनी कुठल्या पक्षात राहावे त्याला आमचा विरोध नाही; मात्र त्यांनी डॉ. बाबासाहेब यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे पाईक होऊन बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले. स्थानिक गांधीभवन येथील आयोजित भारतीय बौद्ध महासभेतर्फे २२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता राजरत्न आंबेडकर उपस्थित जनसमूदायाला संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोकराव आंबेडकर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक प्रा. प्रकाश गवई, आनंद वानखेडे, दिलीपराव जाधव, विश्‍वनाथ दांडगे यांच्यासह बौद्ध विचारांच्या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रास् ताविकात आनंद वानखेडे यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. त्यानंतर प्रा. प्रकाश गवई यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जातीव्यवस्था निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, एसटी, एससी, ओबीसी प्रवर्गाच्या अनुशेष भरती करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, असे सांगितले. राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार दलित या शब्दाचा उल्लेखच नाही; मात्र इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया भारतातल्या मागासवर्गीय जनतेवरील अत्याचाराविरोधात दलित हा शब्दप्रयोग करतात; मात्र दलित हा शब्द घटनाबाह्य आहे. यामागील कारण आंतरराष्ट्रीयदृष्ट्या चुकीचे असून दलितांवरील अत्याचाराच्या बातम्या ह्या बौद्धांवरील अन्याय-अत्याचार या हेडिंगखाली घेणे आवश्यक आहे; मात्र प्रसारमाध्यमे असा शब्दप्रयोग करीत नाही. भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशात गेल्यावर मी बौद्ध राष्ट्राचा प्रतिनिधी आहे, असे दाखवून करोडो रुपये त्या देशांमधून भारतात आणतात व बुलेट ट्रेनची मागणी करतात. वास् तविक पाहता भारतातील मीडिया इथल्या दलित अत्याचारांवर दलित म्हणून प्रकाशझोत टाकतो. कारण बौद्ध राष्ट्र हा उल्लेख झाल्यास यांना करोडो रुपयांचा निधी मिळणे दुरा पास्त होते. त्यामुळे इथल्या दलित बांधवांनी स्वत:ची ओळख बौद्ध म्हणून करावी, असेही त्यांनी सांगितले. यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पाईक होऊन बौद्ध महासभेची नोंदणी करून घेऊन समाजाशी एकनिष्ठ आहोत, याचा प्रत्यय द्यावा. बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच बाबासाहेबांचे भारताला बौद्धमय राष्ट्र करण्याचे स्वप्न साकार होईल. त्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधवांची उपस्थिती होती.