शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

विजेच्या समस्या सोडविण्यासाठी अभियंत्यांसह ‘स्वाभिमानी’ शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST

सोमठाणा येथील जुने गावठाण १०० के.व्ही.चे रोहित्र चार वेळा बदलण्यात आले आहे; परंतु तो वारंवार जळत असल्याने शेतकऱ्यांना शेतात ...

सोमठाणा येथील जुने गावठाण १०० के.व्ही.चे रोहित्र चार वेळा बदलण्यात आले आहे; परंतु तो वारंवार जळत असल्याने शेतकऱ्यांना शेतात पिकाला पाणी देण्याची समस्या निर्माण झाली होती. एकाच रोहित्रावर हा संपूर्ण लोड असल्याने आता पुन्हा नवीन ट्रान्सफार्मर लावला तर तो जळणार, असे दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली होती. या अगोदर उद्‌भवलेल्या समस्या चिखलीचे सहायक अभियंता गायकवाड यांच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या होत्या; परंतु ट्रान्सफार्मर लावला तर तो पुन्हा जळणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता एन.डी.माळोदे यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती. दरम्यान, कार्यकारी अभियंता माळोदे यांनी सोमठाणा गाव गाठून रोहित्राची पाहणी केली. याबाबत नवीन पोल टाकून लोड डीव्हाइड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी गावातील समस्या मांडल्या असता मंदिराजवळील जंगलेला व मोडकळीस आलेला पोल व शेतातील वाकलेले पोल वायरींग करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: गावात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्यावतीने कार्यकारी अभियंता मोळोदे व गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरनाईक, राजपूत, भारत वाघमारे, महावितरण सहायक अभियंता डी.जी.गायकवाड, अवचितराव वाघमारे, अविनाश झगरे, छोटू झगरे, सुदर्शन वाघमारे, परमेश्वर झगरे, अंबादास झगरे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, भागवत झगरे, विठ्ठल झगरे, गणेश झगरे, प्रभाकर झगरे, विजय परिहार, गोटू वाघमारे आदींची उपस्थिती होती.