शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी बँकांची टोलवाटोलवी सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:52 IST

शेतकरी हैराण : कर्जमाफीबाबत अद्याप आदेश नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची घोषणा करून महिना उलटला, तरी बँकांना अद्याप यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे बँकांमध्ये शेतकऱ्यांना टोलवून लावणे सुरूच असून, शेतकरी चकरा मारुन हैराण झालेले आहेत.१ जूनपासून शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप सुरू केल्याने शासनाने ११ जून रोजी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. तर सरसकट कर्जमाफीलाही तत्त्वत: मंजुरी दिली होती. यानंतर २४ जून रोजी सरसकट कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, याकरिता काही निकष लावण्यात आलेले असल्याने कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार व कोणाला नाही, यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे याविषयी विचारणा करण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत; परंतु बँकांकडून आम्हाला कर्जमाफीबद्दल कोणताही आदेश शासनाकडून आलेला नाही, असे म्हणून त्यांना चक्क टोलवून लावले जात असल्याचे दिसून येते. खामगावातील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत, तर चक्क ‘शेतकरी कर्जमाफीविषयी चौकशी करू नये’ असा फलकच लावण्यात आला. कर्जमाफीसंदर्भात आतापर्यंत बँकेला एकही आदेश प्राप्त झाला नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने ‘लोकमत’ला दिली, असा सगळा सावळा गोंधळ असल्यामुळे शेतकरी बँकांमध्ये चकरा मारुन हैराण होत आहेत. शासनाने शेतकऱ्यांची पेरणीची गरज लक्षात घेऊून त्यांना १० हजार रुपयांचे तत्काळ कर्ज देण्याचा आदेशही याअगोदरच दिला होता; परंतु त्यावरही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाचे तळ्यात-मळ्यात! कर्जमाफीसंदर्भात शासनाचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नसून, तळ्यात मळ्यात सुरुच आहे. कर्जमाफीसंबंधी परिपत्रकात दोन-तीन वेळा फेरबदल केल्यानंतरही आता आणखी कर्जमाफीसाठी नव्या गाइडलाइनचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्यामुळे शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात पोरखेळ सुरु असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांमध्ये वाढतोय संताप!शासनाची धरसोडीची भूमिका व प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडचणींचा डोंगर आडवा येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. शासनाने आपल्याला कर्जमाफीच्या नावाखाली फसविले असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.