शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

कर्जमाफीसाठी बँकांची टोलवाटोलवी सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:52 IST

शेतकरी हैराण : कर्जमाफीबाबत अद्याप आदेश नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची घोषणा करून महिना उलटला, तरी बँकांना अद्याप यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे बँकांमध्ये शेतकऱ्यांना टोलवून लावणे सुरूच असून, शेतकरी चकरा मारुन हैराण झालेले आहेत.१ जूनपासून शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप सुरू केल्याने शासनाने ११ जून रोजी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. तर सरसकट कर्जमाफीलाही तत्त्वत: मंजुरी दिली होती. यानंतर २४ जून रोजी सरसकट कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, याकरिता काही निकष लावण्यात आलेले असल्याने कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार व कोणाला नाही, यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे याविषयी विचारणा करण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत; परंतु बँकांकडून आम्हाला कर्जमाफीबद्दल कोणताही आदेश शासनाकडून आलेला नाही, असे म्हणून त्यांना चक्क टोलवून लावले जात असल्याचे दिसून येते. खामगावातील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत, तर चक्क ‘शेतकरी कर्जमाफीविषयी चौकशी करू नये’ असा फलकच लावण्यात आला. कर्जमाफीसंदर्भात आतापर्यंत बँकेला एकही आदेश प्राप्त झाला नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने ‘लोकमत’ला दिली, असा सगळा सावळा गोंधळ असल्यामुळे शेतकरी बँकांमध्ये चकरा मारुन हैराण होत आहेत. शासनाने शेतकऱ्यांची पेरणीची गरज लक्षात घेऊून त्यांना १० हजार रुपयांचे तत्काळ कर्ज देण्याचा आदेशही याअगोदरच दिला होता; परंतु त्यावरही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाचे तळ्यात-मळ्यात! कर्जमाफीसंदर्भात शासनाचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नसून, तळ्यात मळ्यात सुरुच आहे. कर्जमाफीसंबंधी परिपत्रकात दोन-तीन वेळा फेरबदल केल्यानंतरही आता आणखी कर्जमाफीसाठी नव्या गाइडलाइनचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्यामुळे शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात पोरखेळ सुरु असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांमध्ये वाढतोय संताप!शासनाची धरसोडीची भूमिका व प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडचणींचा डोंगर आडवा येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. शासनाने आपल्याला कर्जमाफीच्या नावाखाली फसविले असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.