शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आश्‍वासनानंतर शाळा बंद आंदोलन मागे

By admin | Updated: July 23, 2014 00:07 IST

गावातील पालकांनी गेल्या ४ दिवसांपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद करुन आंदोलन सुरु केले होते.

धाड : येथील उर्दू माध्यमिक शाळेस गेल्या ५ वर्षापासून पुरेसे शिक्षक नसल्याकारणाने शालेय शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे गावातील पालकांनी गेल्या ४ दिवसांपासून मुलांना शाळेत पाठवणे बंद करुन आंदोलन सुरु केले होते. पालकांच्या या आंदोलनाची दखल घेत १९ जुलै रोजी दुपारी शिक्षणाधिकारी वैशाली ठग, गटशिक्षणाधिकारी डी.बी.तेजनकर, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.बोर्डे, तसेच शिक्षण विभागाचे डी.एस.जाधव यांचे पथकाने येथील उर्दू शाळेस भेट दिली. यावेळी अधिकार्‍यांनी आंदोलनकर्ते पालक व ग्रामस्थांशी चर्चा करुन समस्या मार्गी लावत आंदोलन मागे घेण्यात आले. स्थानिक जि.प.उर्दू हायस्कुल धाडच्या वर्ग ८,९,१0 च्या विद्यार्थ्यांना गेल्या ५ वर्षापासून हिंदी, मराठी व शा.शिक्षणास शिक्षक नसल्याने या ठिकाणी केवळ ४ शिक्षक सर्वच विषय शिकवत होते. परिणामी एका वर्गात १५0 विद्यार्थीना बसवून शिक्षण देण्यात येत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.हय़ा परिस्थितीस कंटाळून व वारंवार शिक्षण विभागास विनंती करुनही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले. यामध्ये वर्ग १ ते १0 पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली. शेवटी या ठिकाणी शिक्षणाधिकारी वैशाली ठग व त्यांचे पथकाने जि.प.हाय.च्या समस्या व येथील कारभाराची माहिती घेऊन ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र ग्रामस्थांनी या ठिकाणी तात्काळ कायम स्वरूपी शिक्षक नेमण्याची मागणी लावून धरली. यावेळी शिक्षण विभागातील डी.एस.जाधव हय़ांनी ग्रामस्थांना माहिती दिली की शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत या ठिकाणी कायम शिक्षक देणे शक्य नाही. तेव्हा या ठिकाणी तात्काळ तात्पुरते. २ व २ शिक्षक मराठी माध्यमाचे येथे देण्यात येऊन हा प्रश्न सध्या निकाली काढता येऊ शकतो अशी विनंती वरुन ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी रिझवान सौदागर, म.शफी, सोहिल काजी, म.शमीम, अन्नु सौदागर हय़ांचे सह असंख्य नागरिक व पालक हजर होते.