शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य परिवर्तनाची प्रेरणा देणारे- शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत ...

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे होते. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. श्रीमंतांकडून होणारे श्रमिकांचे शोषण आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडून होणारी सामाजिक व धार्मिक पिळवणूक या दोन गोष्टींचा त्यांनी उभ्या आयुष्यात प्रचंड तिरस्कार केला. त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्यांची वेदना सांगण्याचे काम केले. केवळ दीड दिवस शाळेत जाणारी व्यक्ती ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, १३ कथासंग्रह, १५ पोवाडे, ३ नाटकं, १ प्रवासवर्णन, १ शाहिरी पुस्तक एवढी मोठी साहित्यसंपदा निर्माण करते, यावरून त्यांची साहित्यसम्राट ही पदवी सार्थ ठरते, असे मत जयश्री शेळके यांनी व्यक्त केले. त्यांच्या वैजयंता, आवडी, वारणेचा वाघ, चित्रा, फकिरा, माकडीचा माळ, अलगुज या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. जगातील २२ भाषेत त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. यावरून त्यांची साहित्यातील उंची आपल्या लक्षात येते. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांनी आता बदलले पाहिजे, असा विचार त्यांनी टिटवाळा येथील शेतकरी परिषदेत मांडला. दादर येथील पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी या विचारमंचावरून मांडला, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.

महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम

अण्णा भाऊ साठे आपल्या शाहिरी, पोवाडा, वग, नाटक, वंदनगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करायचे. त्यांनी रशियात शिवरायांचा पोवाडा सादर केला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा, सामाजिक न्यायाचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला. त्यांनी आपली फकिरा ही कादंबरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम केले, असे मत या व्याख्यानमालेत व्यक्त करण्यात आले.