शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य परिवर्तनाची प्रेरणा देणारे- शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत ...

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे होते. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. श्रीमंतांकडून होणारे श्रमिकांचे शोषण आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडून होणारी सामाजिक व धार्मिक पिळवणूक या दोन गोष्टींचा त्यांनी उभ्या आयुष्यात प्रचंड तिरस्कार केला. त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्यांची वेदना सांगण्याचे काम केले. केवळ दीड दिवस शाळेत जाणारी व्यक्ती ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, १३ कथासंग्रह, १५ पोवाडे, ३ नाटकं, १ प्रवासवर्णन, १ शाहिरी पुस्तक एवढी मोठी साहित्यसंपदा निर्माण करते, यावरून त्यांची साहित्यसम्राट ही पदवी सार्थ ठरते, असे मत जयश्री शेळके यांनी व्यक्त केले. त्यांच्या वैजयंता, आवडी, वारणेचा वाघ, चित्रा, फकिरा, माकडीचा माळ, अलगुज या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. जगातील २२ भाषेत त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. यावरून त्यांची साहित्यातील उंची आपल्या लक्षात येते. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांनी आता बदलले पाहिजे, असा विचार त्यांनी टिटवाळा येथील शेतकरी परिषदेत मांडला. दादर येथील पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी या विचारमंचावरून मांडला, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.

महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम

अण्णा भाऊ साठे आपल्या शाहिरी, पोवाडा, वग, नाटक, वंदनगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करायचे. त्यांनी रशियात शिवरायांचा पोवाडा सादर केला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा, सामाजिक न्यायाचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला. त्यांनी आपली फकिरा ही कादंबरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम केले, असे मत या व्याख्यानमालेत व्यक्त करण्यात आले.