शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य परिवर्तनाची प्रेरणा देणारे- शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत ...

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे होते. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. श्रीमंतांकडून होणारे श्रमिकांचे शोषण आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडून होणारी सामाजिक व धार्मिक पिळवणूक या दोन गोष्टींचा त्यांनी उभ्या आयुष्यात प्रचंड तिरस्कार केला. त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्यांची वेदना सांगण्याचे काम केले. केवळ दीड दिवस शाळेत जाणारी व्यक्ती ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, १३ कथासंग्रह, १५ पोवाडे, ३ नाटकं, १ प्रवासवर्णन, १ शाहिरी पुस्तक एवढी मोठी साहित्यसंपदा निर्माण करते, यावरून त्यांची साहित्यसम्राट ही पदवी सार्थ ठरते, असे मत जयश्री शेळके यांनी व्यक्त केले. त्यांच्या वैजयंता, आवडी, वारणेचा वाघ, चित्रा, फकिरा, माकडीचा माळ, अलगुज या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. जगातील २२ भाषेत त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. यावरून त्यांची साहित्यातील उंची आपल्या लक्षात येते. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांनी आता बदलले पाहिजे, असा विचार त्यांनी टिटवाळा येथील शेतकरी परिषदेत मांडला. दादर येथील पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी या विचारमंचावरून मांडला, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.

महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम

अण्णा भाऊ साठे आपल्या शाहिरी, पोवाडा, वग, नाटक, वंदनगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करायचे. त्यांनी रशियात शिवरायांचा पोवाडा सादर केला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा, सामाजिक न्यायाचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला. त्यांनी आपली फकिरा ही कादंबरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम केले, असे मत या व्याख्यानमालेत व्यक्त करण्यात आले.