शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

साथरोग वाढले

By admin | Updated: July 24, 2014 23:55 IST

रुग्णालये हाऊसफुल्ल : ढगाळ वातावरणाचा परिणाम

मेहकर : गत तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पावसामुळे सर्वत्र दमट व ओलसर वातावरण निर्माण झाले असून, या वातावरणामुळे बुरशीजन्य व साथीच्या आजाराला उभारी मिळत आहे. त्यामध्ये डायरिया व टायफाईडचे सर्वाधिक रुग्ण असून, शासकीय तसेच खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झालेली दिसून येत आहेत. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे दम्याच्या आजारानेही डोके वर काढले आहे. पावसाळ्यापूर्वी गोवोगावी स्वच्छता अभियानाचे विविध उपक्रम राबविण्यात येतात; परंतु अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याने घाणीचे साम्राज्य गावोगावी पाहायला मिळत आहे. यामुळे विविध डासांची उत्पत्ती होत आहे. वाढती अस्वच्छता, मच्छरांचा उच्छाद व रिमझिम पाऊस अशा वातावरणामुळे साथीच्या आजाराने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या साथी प्रामुख्याने आढळतात. पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात व त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टोस्पॉयसिस आजारही उद्भवतात. शासकीय तसेच खासगी रुग्यालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये डायरिया व टायफाईडचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे आढळुन आले आहे. हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनने डोके वर काढले होते. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागात याचे अनेक रुग्ण बळी ठरले होते. आता पावसाळ्यात पुन्हा साथीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. सद्यस्थितीत वातावरणातील अचानक झालेल्या दमट बदलाचा परिणाम म्हणून सर्दी, खोकला व ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. साथीच्या आजाराचे प्रत्येक घराघरात रुग्ण आढळून येत आहेत. त्यात बदलते वातावरण काळाचा घालाच. ढगाळ वातावरणामुळे दम्याचा विकार बळावत असून, यामध्ये वृद्धांसह लहान मुलांचाही समावेश असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.