शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी न केल्यास आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:37 IST

चिखली : खरीप हंगाम जवळ आलेल्या असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे ...

चिखली : खरीप हंगाम जवळ आलेल्या असताना केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असून केंद्र सरकारने खतांच्या किमती तातडीने कमी कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना व युवासेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात कोरोनामुळे आधीच शेतकरी विवंचनेत साडपलेला असताना ऐन हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तसेच डिझेलच्या किमतीतही वाढ झालेली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीच्या कामाचे नियोजन कोलमडले आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पावले उचलून खते व डिझेलचे भाव तातडीने कमी करावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, प्रीतम गैची, बाजार समितीचे संचालक गजानन पवार, नगरसेवक दत्ता सुसर, विलास घोलप, मनोज वाघमारे, समाधान जाधव, शाम शिंगणे, आनंद गैची, रवि पेटकर, बन्टी कपूर, शुभम खरपास, विशाल इंगळे, हरी इंगळे, पप्पू परिहार आदींची स्वाक्षरी आहे़