शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टी नसणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:02 IST

चोरट्यांचा गुरांवर डोळा देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील एकनाथ सखाराम शिंगणे यांच्या मालकीची ...

चोरट्यांचा गुरांवर डोळा

देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील एकनाथ सखाराम शिंगणे यांच्या मालकीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त

किनगाव राजा : तापमानात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होते. अंगावर थंड पाण्याचा फवारा घेण्याची इच्छा होते. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी पोहण्याचा आनंद घेतला जायचा. परंतु लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे

दुसरबीड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात मधल्या काळात मिनी लॉकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि व्यापाऱ्यांना दिवसा मर्यादित कालावधीत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली गेली होती. मात्र व्यावसायिक तथा ग्राहकांकडून अद्यापही शारीरिक अंतराचे पालन केल्या जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार

सिंदखेड राजा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार मिळत आहे. मात्र वॉटर एटीएममध्ये टाकण्यासाठी नाण्यांची गरज भासते. त्यामुळे सिंदखेड राजा शहर परिसरात नाण्यांचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संचारबंदीमुळे आर ओ कॅन घरपोच मिळत नाही. त्यामुळे वॉटर एटीएमचा आधार घ्यावा लागत आहे.

पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी

साखरखेर्डा : केंद्र शासनाने जनधन योजनेच्या खात्यात ५०० रुपये जमा केले आहेत. लवकर पैसे काढले नाही तर ते परत जातील या भीतीपोटी नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.

मास्क वापराकडे दुर्लक्ष

सिंदखेड राजा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे ग्राहक व व्यापाऱ्यांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात १००० व्यक्तीमागे सात जणांना कोरोना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे झाले आहे.