शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

रॉयल्टी नसणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:02 IST

चोरट्यांचा गुरांवर डोळा देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील एकनाथ सखाराम शिंगणे यांच्या मालकीची ...

चोरट्यांचा गुरांवर डोळा

देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील एकनाथ सखाराम शिंगणे यांच्या मालकीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तापमान वाढल्याने नागरिक त्रस्त

किनगाव राजा : तापमानात वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारी प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होते. अंगावर थंड पाण्याचा फवारा घेण्याची इच्छा होते. उकाड्यापासून सुटका करण्यासाठी पोहण्याचा आनंद घेतला जायचा. परंतु लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे

दुसरबीड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात मधल्या काळात मिनी लॉकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि व्यापाऱ्यांना दिवसा मर्यादित कालावधीत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिली गेली होती. मात्र व्यावसायिक तथा ग्राहकांकडून अद्यापही शारीरिक अंतराचे पालन केल्या जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार

सिंदखेड राजा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार मिळत आहे. मात्र वॉटर एटीएममध्ये टाकण्यासाठी नाण्यांची गरज भासते. त्यामुळे सिंदखेड राजा शहर परिसरात नाण्यांचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संचारबंदीमुळे आर ओ कॅन घरपोच मिळत नाही. त्यामुळे वॉटर एटीएमचा आधार घ्यावा लागत आहे.

पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी

साखरखेर्डा : केंद्र शासनाने जनधन योजनेच्या खात्यात ५०० रुपये जमा केले आहेत. लवकर पैसे काढले नाही तर ते परत जातील या भीतीपोटी नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.

मास्क वापराकडे दुर्लक्ष

सिंदखेड राजा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे ग्राहक व व्यापाऱ्यांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात १००० व्यक्तीमागे सात जणांना कोरोना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे झाले आहे.