शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी सरपंचावरही कारवाई हवीच!

By admin | Updated: April 28, 2017 00:04 IST

लोकमत परिचर्चेतील सूर : गाव समृद्ध करण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभार आवश्यक

बुलडाणा : ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार प्रकरणी ग्रामसेवकांसह सरपंच व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र प्रथम भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून सरपंच व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असा सूर बुधवारी भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे योग्य आहे कां? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मुळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त असल्याचा आदेश ग्रामविकास खात्याने काढला आहे. या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सचिव, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रथम प्राथमिक चौकशी करावी. ही चौकशी गटविकास अधिकारी यांनी एका महिन्यात पूर्ण करणे आवश्यक असल्याचे याबाबतच्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे. मात्र पदाधिकाऱ्यांना सरळ फौजदारी गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे मत् ा परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले आहे. याबाबत सखोल चौकशी करून अपहाराची रक्कम वसुल करण्याची कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत परिचर्चेत सहभागी काही मान्यवरांनी व्यक्त केले.गावाच्या विकासासाठी कोणतेही कामे करताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जाते. याशिवाय सहा महिन्यात तसेच वार्षिक सभेत सर्व जमा खर्च मांडण्यात येत असून पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यास मंजुरात देण्यात येते. तसेच माहितीच्या अधिकाराअंतर्गंत कलम चार नुसार गावातील विकास कामांचा लेखा जोखा सर्व ग्रामस्थांसाठी खुला करणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी माहिती ग्रामस्थांना देण्यास नकार देतात. त्यामुळे चौकशी करून सरपंच तसेच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.-अरविंद टेकाळे, प्रसिध्दी प्रमुख, जि.प.कर्मचारी महासंघ, बुलडाणा.शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मात्र निधी खर्च करण्यासाठी मोठ्या जाचक अटी लादल्यामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. तसेच भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. शासनाने विकास कामे मंजूर करून अंमलबजावणीचे अधिकार शासन अधिकाऱ्यास दिल्यामुळे सरपंच तसेच पदाधिकाऱ्यांचा थेट संबंध येत आहे. परंतु शासनाच्या आदेशामुळे चांगल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. -कौतीकराव पाटील, सरपंच, कोलवड, ता.बुलडाणा.गावाचा विकासासाठी शासनाचे अधिकारी व गावातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून चांगली कामे करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून शासनाने नियमावली सादर केली आहे. विकास कामात भ्रष्टाचार झाल्यास गावातील मंडळी पुन्हा पदाधिकाऱ्यांना निवडून देणार नाही. त्यामुळे सरपंच किंवा पदाधिकारी भ्रष्टाचारापासून दूर राहतात. मात्र गावाचा विकास करताना काही ठिकाणी अनियमितता झाल्यास भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. अशावेळी राजकारणाने प्रेरीत अनेक व्यक्ती आरोप, प्रत्यारोप करीत असतात. त्यामुळे भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच,पदाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे.- अनिल कोळसे, सामाजिक कार्यकर्ते, साखळी बु.भ्रष्टाचार प्रकरणी सरळ सरपंच किंवा पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. कारण गावातील विविध विकास निधी आणण्याचे काम ग्रामसचिवाचे असते. त्याने सदर कामे कोणामुळे न झुकता, कोणत्याही दबावाला बळी न पडता केल्यास भ्रष्टचार होणार नाही. आजरोजी काही ठिकाणी भ्रष्टाचार सरपंच किंवा पदाधिकाऱ्यांच्या नावाने ग्रामसचिव करीत असल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे प्रथम भ्रष्ट ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल केल्यास भ्रष्टाचार कमी होईल व गावातील विकास कामे चांगल्या पध्दतीने होवून गावाचा विकासाला मदत होईल.- अंबादास घाडगे पाटील, शेतकरी, सातगाव भुसारी.ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून गावाच्या विकासासाठी कामे केली पाहिजेत. या प्रकरणी कोणावरही अत्याचार होवू नये ही अपेक्षा असते. मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. याबाबत सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. चौकशी दरम्यान कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार फौजदारीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवर वचक निर्माण होवून विकास कामे चांगल्या पध्दतीने होतील व गावाचा विकास होईल.- श्लोकानंद डांगे पाटील, प्रसिध्दी प्रमुख, काँग्रेस, बुलडाणा