शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ...

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ते आतापर्यंत २८ गावांच्या पणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी देखील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा आहे़ त्यामुळे तालुक्याला गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची तीव्रता थोडी कमी आहे. असे असले तरी तालुक्यातील २८ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने २६ गावांसाठी विहिरींचे तर २ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसात वाढ होण्याची शक्यता असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. दरम्यान, पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी चार गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेली गावे

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, पेठ, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, डासाळा, साकेगाव, तोरणवाडा, खोर खैरव, भोगावती सैलानी नगर, असोला बु., कोलारा, अमोना, भरोसा, रानअंत्री, टाकरखेड मु., वैरागड, भालगाव, पिंपरखेड, भानखेड, मेरा खुर्द, माळशेंबा, अंत्री खेडेकर या गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरीं व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना टँकरचा आधार

तालुक्यातील असोला बु., भोगावती-सैलानी नगर, असोला खु, कोलारा या चार गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यानुषंगाने खासगी विहिरींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे.

हातणीचा पाणीपुरवठा विस्कळीत !

सद्यस्थितीत हातणी ते धाड या 'नॅशनल हायवे ७५३ एम' या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे हातणी या गावच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन गेल्या पाच महिन्यांपूर्वी फुटली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अद्याप पाईपलाईनची दुरूस्ती करून दिलेली नाही. तथापि याबाबत जाब विचारणारे राम जाधव यांच्यावरच पोलिसांत तक्रार देण्याचा प्रकार घडला आहे. परिणामी या गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याची दखल घेत जाधव यांनी स्वखर्चातून एक विहिरीवरून पाईपलाईन टाकून गावास पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.