शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ...

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ते आतापर्यंत २८ गावांच्या पणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी देखील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा आहे़ त्यामुळे तालुक्याला गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची तीव्रता थोडी कमी आहे. असे असले तरी तालुक्यातील २८ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने २६ गावांसाठी विहिरींचे तर २ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसात वाढ होण्याची शक्यता असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. दरम्यान, पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी चार गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेली गावे

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, पेठ, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, डासाळा, साकेगाव, तोरणवाडा, खोर खैरव, भोगावती सैलानी नगर, असोला बु., कोलारा, अमोना, भरोसा, रानअंत्री, टाकरखेड मु., वैरागड, भालगाव, पिंपरखेड, भानखेड, मेरा खुर्द, माळशेंबा, अंत्री खेडेकर या गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरीं व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना टँकरचा आधार

तालुक्यातील असोला बु., भोगावती-सैलानी नगर, असोला खु, कोलारा या चार गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यानुषंगाने खासगी विहिरींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे.

हातणीचा पाणीपुरवठा विस्कळीत !

सद्यस्थितीत हातणी ते धाड या 'नॅशनल हायवे ७५३ एम' या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे हातणी या गावच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन गेल्या पाच महिन्यांपूर्वी फुटली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अद्याप पाईपलाईनची दुरूस्ती करून दिलेली नाही. तथापि याबाबत जाब विचारणारे राम जाधव यांच्यावरच पोलिसांत तक्रार देण्याचा प्रकार घडला आहे. परिणामी या गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याची दखल घेत जाधव यांनी स्वखर्चातून एक विहिरीवरून पाईपलाईन टाकून गावास पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.