शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ...

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ते आतापर्यंत २८ गावांच्या पणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी देखील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा आहे़ त्यामुळे तालुक्याला गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची तीव्रता थोडी कमी आहे. असे असले तरी तालुक्यातील २८ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने २६ गावांसाठी विहिरींचे तर २ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसात वाढ होण्याची शक्यता असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. दरम्यान, पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी चार गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेली गावे

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, पेठ, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, डासाळा, साकेगाव, तोरणवाडा, खोर खैरव, भोगावती सैलानी नगर, असोला बु., कोलारा, अमोना, भरोसा, रानअंत्री, टाकरखेड मु., वैरागड, भालगाव, पिंपरखेड, भानखेड, मेरा खुर्द, माळशेंबा, अंत्री खेडेकर या गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरीं व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना टँकरचा आधार

तालुक्यातील असोला बु., भोगावती-सैलानी नगर, असोला खु, कोलारा या चार गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यानुषंगाने खासगी विहिरींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे.

हातणीचा पाणीपुरवठा विस्कळीत !

सद्यस्थितीत हातणी ते धाड या 'नॅशनल हायवे ७५३ एम' या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे हातणी या गावच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन गेल्या पाच महिन्यांपूर्वी फुटली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अद्याप पाईपलाईनची दुरूस्ती करून दिलेली नाही. तथापि याबाबत जाब विचारणारे राम जाधव यांच्यावरच पोलिसांत तक्रार देण्याचा प्रकार घडला आहे. परिणामी या गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याची दखल घेत जाधव यांनी स्वखर्चातून एक विहिरीवरून पाईपलाईन टाकून गावास पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.