शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यातील २८ गावांची भिस्त अधिग्रहणावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ...

चिखली : तालुक्यातील २८ गावांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात आल्या असून गत जानेवारी ते आतापर्यंत २८ गावांच्या पणीटंचाई निवारणार्थ विहिरी व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी देखील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गतवर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणीपुरवठ्याच्या जलस्रोत्रांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा आहे़ त्यामुळे तालुक्याला गतवर्षाच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची तीव्रता थोडी कमी आहे. असे असले तरी तालुक्यातील २८ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवली आहे. या गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांनी तळ गाठला असल्याने प्रशासनाने २६ गावांसाठी विहिरींचे तर २ गावांसाठी बोअरचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहित विहिरी व बोअरवरून या गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शहरातदेखील आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे येत्या काळात शहरात पाणीपुरवठ्याच्या दिवसात वाढ होण्याची शक्यता असली तरी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. दरम्यान, पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या १४ पैकी चार गावांची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. या गावांना नववर्षाच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

विहिरी व बोअरचे अधिग्रहण झालेली गावे

तालुक्यातील दिवठाणा, बोरगाव वसू, पेठ, असोला बु., सोमठाणा, आमखेड, मिसाळवाडी, डासाळा, साकेगाव, तोरणवाडा, खोर खैरव, भोगावती सैलानी नगर, असोला बु., कोलारा, अमोना, भरोसा, रानअंत्री, टाकरखेड मु., वैरागड, भालगाव, पिंपरखेड, भानखेड, मेरा खुर्द, माळशेंबा, अंत्री खेडेकर या गावांमधील पाणीटंचाई निवारणार्थ खासगी विहिरीं व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना टँकरचा आधार

तालुक्यातील असोला बु., भोगावती-सैलानी नगर, असोला खु, कोलारा या चार गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यानुषंगाने खासगी विहिरींचे देखील अधिग्रहण करण्यात आले असून या अधिग्रहीत विहिरीवरून टँकर भरून गावास पाणीपुरवठा केला जात आहे.

हातणीचा पाणीपुरवठा विस्कळीत !

सद्यस्थितीत हातणी ते धाड या 'नॅशनल हायवे ७५३ एम' या महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे हातणी या गावच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन गेल्या पाच महिन्यांपूर्वी फुटली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने अद्याप पाईपलाईनची दुरूस्ती करून दिलेली नाही. तथापि याबाबत जाब विचारणारे राम जाधव यांच्यावरच पोलिसांत तक्रार देण्याचा प्रकार घडला आहे. परिणामी या गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याची दखल घेत जाधव यांनी स्वखर्चातून एक विहिरीवरून पाईपलाईन टाकून गावास पाणीपुरवठ्याची सोय केली आहे.