शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

पीक विम्यात आधार कार्डचा खोळंबा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:10 IST

बुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र आधार कार्ड नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून काढण्यापासून वंचित राहत आहेत. गतवर्षी तब्बल तीन लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावेळी आतापर्यंंत केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनीच पीक विमा  काढला आहे. 

ठळक मुद्देजिल्हय़ात आतापर्यंंत ५८ हजार शेतकर्‍यांनीच काढला विमा 58000 शेतकर्‍यांनी काढला विमा 35000 शेतकर्‍यांचा ऑफलाइन विमा24000 पीक कर्ज घेतलेले शेतकरी

विवेक चांदूरकर। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतमालाचा पीक विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र आधार कार्ड नसल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून काढण्यापासून वंचित राहत आहेत. गतवर्षी तब्बल तीन लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावेळी आतापर्यंंत केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनीच पीक विमा  काढला आहे. शासनाच्यावतीने पीक विमा  ऑनलाइन काढण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र यामध्ये अनेक अडचणी आल्याने शेतकरी पीक विमा  काढू शकले नाहीत. शासनाच्या ही बाब लक्षात येताच पीक विमा  ऑफलाइन काढण्याचा निर्णय २८ जुलै रोजी घेण्यात आला; मात्र विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शेतकरी यापासून वंचित राहले. त्यामुळे शासनाने ५ ऑगस्टपर्यंंत मुदत वाढ दिली आहे. शासनाने मुदतवाढ दिली असली, तरी पीक विमा  काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. यावर्षी विमा काढण्याकरिता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार कार्ड नसले, तर आधार कार्ड काढण्याकरिता दिल्यानंतर मिळत असलेली पावती आवश्यक आहे; मात्र आधार कार्ड अनिवार्य असल्याची माहिती शेतकर्‍यांना आधी देण्यात आली नाही. ऐनवेळी माहिती मिळाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांकडे आधार कार्ड नव्हते, त्यामुळे शेतकरी पीक विमा  काढू शकले नाहीत. सध्या ऑफलाइन पीक विमा  काढण्यात येत असला, तरी आधार कार्ड मागण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी पीक विमा  काढण्याचा अर्ज भरला; मात्र त्यांचे आधार कार्ड लिंक झाले नाही, तर रक्कम स्वीकारल्या जाणार नाही.   जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३ लाख ६३ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला होता, तर यावर्षी ३१ जुलैपर्यंंत केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनीच विमा काढला आहे. यामध्ये २४ हजार शेतकरी पीक कर्ज घेतलेले आहेत, तर केवळ ३५ हजार शेतकर्‍यांनीच विमा काढला आहे. त्यामुळे यावर्षी पीक विमा  काढणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण अल्प आहे.     जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार शेतकरी आहेत.  यापैकी केवळ ५८ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा  काढला असून,  आधार कार्डच्या अडचणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा  काढण्यापासून वंचित राहत आहेत. 

नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकर्‍यांची उदासीनता गतवर्षी मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांनी पीक विमा काढला होता; मात्र शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. गतवर्षी जिल्ह्यात कपाशीचे उत्पन्न चांगले झाल्याचा अहवाल देण्यात आल्याने एकाही कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला नाही, तसेच अन्य शेतकर्‍यांनाही विका मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी यावर्षी याकडे पाठ फिरविली आहे. 

बँकांचा कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचे पैसे भरण्याकडे कानाडोळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा बँकांच्यावतीने काढण्यात येतो. जिल्ह्यात ३२ हजार शेतकर्‍यांनी गतवर्षीचे कर्ज भरून नवीन पीक कर्ज घेतले आहे; मात्र कर्ज घेतलेल्या २४  हजार शेतकर्‍यांचाच विमा बँकांनी काढला आहे. या शेतकर्‍यांकडे आधार कार्ड नसल्याचे कारण बँकेच्यावतीने देण्यात आले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाल्यानंतर शेतकरी सदर पैसे कर्जाच्या रकमेत वर्ग करण्याला विरोध करतात. त्यामुळे बँकांच्यावतीने यावर्षी कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचा विमा काढण्याकडे कानाडोळा करण्यात आला.

मुदतवाढीचा बँकांना आदेशच नाही?पीक विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती; मात्र शासनाने यामध्ये वाढ करून ५ ऑगस्टपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ मिळाल्याचे वृत्त विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाले. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी अनेक शेतकरी बँकांमध्ये पीक विमा काढण्याकरिता गेले; मात्र यावेळी जिल्ह्यातील काही ठिकाणी बँकेच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना पीक विमा काढण्याच्या मुदतवाढीचा आदेश अजूनपर्यंंत आमच्याकडे आलाच नसल्याचे कारण सांगत परत पाठविले. त्यामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकरी गावातून पैसे खर्च करून बँकेत गेले; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.