शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

५३ हजार ग्रा.पं.कर्मचार्‍यांना वाढीव भत्ता

By admin | Updated: June 30, 2014 02:10 IST

ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश : भत्ता न देणार्‍या ग्रामपंचायतीवर फौजदारी कारवाई.

बुलडाणा : ५ फेब्रुवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना लागु करण्यात आलेला वाढीव महागाई भत्ता लागु न केल्यास अशा ग्रमापंचायतीच्या सरपंच व सचिवाविरुध्द फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे निर्देश ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिले. शासन निर्णय लागू झाल्यानंतर राज्या तील ५३ हजार ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना दरमाहा १४५0 रुपये भत्ता लागू देण्याचे आदेश होते मात्र, केवळ २५ टक्के ग्रामपंचायतींनीच या निर्णयाची अंमलबजावणी केली. या संदर्भात ११ जून रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीला राज्यमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास खात्याचे सचिव उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच वेतन अनुदान कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा करणे, महागाही भत्ता लागु करणे आणि ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना चतुर्थ श्रेणी लागू करण्या संदर्भात सुध्दा चर्चा झाली. राज्यात ग्रामपंचायतचे ५३ हजार कर्मचारी आहेत. यामध्ये कुशल (लिपिक), अर्धकुशल (पाणी पुरवठा दिवाबत्ती कर्मचारी) आणि अकुशल (शिपाई व सफाई कामगार) अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांची परिमंडळा नुसार वेनतश्रेणी निश्‍चित करण्यात आली आहे. या वेतनश्रेणी नुसार त्यांना किमान वेतन अधिक महागाई भत्ता, अधिक राहणीमान भत्ता असा एकूण ११00 रुपये मिळत होते. या तुटपुंज वेतनावर उदरनिर्वाह होत नाही,त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ करावी अशी अनेक वर्षापासूनची या कर्मचार्‍यांची मागणी होती. ही मागणी शासनाने मान्य करीत ५ फेब्रुवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ५३ हजार कर्मचार्‍यांना वाढीव भत्ता मिळणार होता. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने कर्मचारी वाढीव भत्त्यापासून वंचित आहेत.या संदर्भात ग्रामविकास मंत्र्याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन शासन निर्णयानुसार कर्मचार्‍यांना वाढीव भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान सुधारीत किमान वेतन लागु झाल्यापासून कर्मचार्‍यांना फरकाची रक्कम सुध्दा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.