शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सिंदखेडा राजा तालुक्यात ५० टक्के पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

सिंदखेड राजा : तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला असून ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या आठ दिवसात ...

सिंदखेड राजा : तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला असून ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या आठ दिवसात तालुक्यातील ७० हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण होतील असा दावा कृषी विभागाने केला आहे.

सिंदखेड राजा तालुक्यात एकूण ७१ हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य आहे. खरिपात कपाशी, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर असतो. मात्र, यंदा कपाशीचे क्षेत्र कमी होऊन तुरीचे क्षेत्र वाढविले पाहिजे यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत असून कडधान्य पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील हंगामात कपाशी क्षेत्र २२ हजार हेक्टर होते, त्यात यंदा घट होणार असून १९ हजार हेक्टरवर कपाशी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या हंगामात आतापर्यंत ७ हजार हेक्टरवर कपाशी लागवड पूर्ण झाली आहे. सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ३४ हजार हेक्टर आहे. त्यातील १९ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. तूर लागवड ६ हजार हेक्टरवर होते मात्र यावेळी कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत तूर, मूग, उडीद यांच्या पेरणीत वाढ होत आहे. कडधान्य सर्व पिके मिळून १२ हजार हेक्टर वाढ होणार आहे. इतर पिकांना देखील शेतकरी प्राधान्य देतात. परंतु कडधान्य विकास कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपले उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मका लागवड क्षेत्र एक ते दीड हजार हेक्टरवर असेल. भुईमूग व अन्य पिकांना देखील शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत.

-- तालुक्यात सर्वदूर पाऊस--

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने पेरणीला वेग आला आहे. बुधवारी झालेला पाऊस तालुक्यात सर्वदूर पडल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील राजेगाव शिवारात जास्त पाऊस झाल्याने तेथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. अर्थात पेरणी पूर्वी झालेलं पाऊस असल्याने चार दिवस पेरणी पुढे ढकलावी लागणार आहे. यंदा पाऊस समाधान कारक झाल्यास शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुधारेल.