शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

जिल्ह्यातील ४९ हजार ८३९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ ...

बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आला असून, अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३२ हजार ८४७.८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते, तर सप्टेंबरमध्ये ६१ हजार ६८९.२४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते.

त्या अ०नुषंगाने नुकसानाची पाहणी करून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम समानपणे टाकण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. रब्बी हंगामात हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. जिल्ह्यातील जवळपास ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला मदत कधी मिळेल, याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पैसेवारी कमी आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे स्पष्टच आहे.

दिवाळीत मिळाली होती शेतकऱ्यांना मदत

दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अद्याप जिल्ह्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे लक्ष लागून राहलेले आहे.

प्राप्त ५० टक्के निधीचे झाले वाटप

पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठीप्राप्त ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. एकूण मागणीच्या तो ५० टक्के होता. आता उर्वरित ५० टक्के निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यासंदर्भाने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.