शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४९ हजार ८३९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ ...

बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आला असून, अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३२ हजार ८४७.८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते, तर सप्टेंबरमध्ये ६१ हजार ६८९.२४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते.

त्या अ०नुषंगाने नुकसानाची पाहणी करून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम समानपणे टाकण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. रब्बी हंगामात हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. जिल्ह्यातील जवळपास ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला मदत कधी मिळेल, याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पैसेवारी कमी आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे स्पष्टच आहे.

दिवाळीत मिळाली होती शेतकऱ्यांना मदत

दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अद्याप जिल्ह्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे लक्ष लागून राहलेले आहे.

प्राप्त ५० टक्के निधीचे झाले वाटप

पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठीप्राप्त ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. एकूण मागणीच्या तो ५० टक्के होता. आता उर्वरित ५० टक्के निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यासंदर्भाने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.