शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्ह्यातील ४९ हजार ८३९ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:51 IST

बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ ...

बुलडाणा : खरीप हंगामता जिल्ह्यात तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांचे ९४ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यापैकी ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आला असून, अद्यापही ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३२ हजार ८४७.८५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते, तर सप्टेंबरमध्ये ६१ हजार ६८९.२४ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे १ लाख ४४ हजार ३६५ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते.

त्या अ०नुषंगाने नुकसानाची पाहणी करून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी ४७ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम समानपणे टाकण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. रब्बी हंगामात हा निधी मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. जिल्ह्यातील जवळपास ४९ हजार ८३९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला मदत कधी मिळेल, याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. पैसेवारी कमी आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे स्पष्टच आहे.

दिवाळीत मिळाली होती शेतकऱ्यांना मदत

दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अद्याप जिल्ह्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील मदतीकडे लक्ष लागून राहलेले आहे.

प्राप्त ५० टक्के निधीचे झाले वाटप

पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठीप्राप्त ४७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. एकूण मागणीच्या तो ५० टक्के होता. आता उर्वरित ५० टक्के निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यासंदर्भाने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.