शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: April 27, 2017 01:53 IST

खरीप हंगामाची तयारी : कृषी विस्तार, पेरणीसाठी जनजागृती करणार!

नीलेश शहाकार - बुलडाणाजिल्ह्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे. हंगामादरम्यान बी-बियाणे कोणते विकत घ्यावे, माती परीक्षण कसे व कुठे करावे, पेरणी केव्हा करावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंदा कृषी विभागाकडून ३९१ कृषिमित्रांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात २०१७-१८ या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असून, १०० टक्के पेरणीची उद्दिष्टपूर्ती डोळ्यापुढे ठेवून कृषी विभागाकडून प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. यानुसार खरीप पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना कोठलीच अडचण येऊ नये, म्हणून यंदा काही प्रयोगशील शेतकऱ्यांची कृषिमित्र म्हणून निवड करण्यात आली आहे.दोन गावांमधून एका शेतकऱ्याची कृषिमित्र म्हणून नेमणूक करण्याबाबत खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिल्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सदर शेतकरी मित्रांची निवड ग्रामपंचायतकडून झालेली असून, येत्या खरीप हंगामामध्ये त्यांच्याकडून कृषी विस्ताराचे कार्य करून घेण्यात येणार आहे. कृषी विभागावरील ताण कमी होणारखरीप हंगाम-२०१७ मध्ये प्रथमच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषिमित्रांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या कामांचा कृषी विभागावर पडणारा ताण काही अंशी कमी होण्यास मदत होईल; मात्र खरीप हंगाम-२०१६ मध्ये कृषिमित्र नसल्याने सदर कामे कृषी सहायक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्यात आली होती.