शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

वृक्ष लागवडीसाठी २६ यंत्रणा कार्यरत

By admin | Updated: June 3, 2017 00:45 IST

मोहिमेची अंमलबजावणी तीन टप्प्यांत : ग्रामपंचायत यंत्रणेला सर्वात जास्त उद्दिष्ट

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य २६ यंत्रणा मोहिमेत सहभागी होणार आहेत.झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे दरवर्षी कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी शासन विविध योजनेंतर्गत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देते. विविध योजनांच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन देते. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, यावर्षी कोटीचे उद्दिष्ट राज्याचे आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला यंदा ८.५२ लाख वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३.१५ लाख इतके देण्यात आले आहे, तर सामाजिक वनीकरणचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्याला मागील वर्षी तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गंत ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्ष रोपणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जिवंत आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, सर्वात जास्त उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजार वृक्षाचे देण्यात आले आहे.मोहिमेत सहभागी मुख्य २६ यंत्रणाबुलडाणा जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये प्रशासनाच्या मुख्य २५ यंत्रणा सहभागी होणार आहेत. त्यात वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार तथा वस्त्रोद्योग विभाग, शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग, गृह विभाग, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, महावितरण, अन्न औषध प्रशासनाचे दवाखाने, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, परिवहन विभागाचे राज्य परिवहन विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग, विधी न्याय विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे सिंचन विभाग व पाटबंधारे तसेच कौशल्य विकास विभाग, महसूल विभाग, बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, केंद्र सरकारचे बीएसएनएल व जिल्हा डाक कार्यालय, क्रीडा विभाग तसेच ग्रामविकास विभाग या सर्व शासकीय विभागांना एकूण ८ लाख ५२ हजार वृक्ष रोपण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.मोहिमेची अंमलबजावणी तीन टप्प्यांतराज्यात पहिल्या टप्प्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कालावधी १ ते ७ जुलै २०१७ राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१८ राहणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्याचा कालावधी १ ते ७ जुलै २०१९ राहणार आहे.