शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

२.५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:05 IST

लोणार  : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस गायब आठ दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकटशेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार  : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोणार तालुक्यात कृषी हंगाम हा शेतकर्‍यांची अर्थ वाहिनी आहे. त्यामुळे या हंगामावर शेतकर्‍यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच ६ आणि ७ जून रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकर्‍यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस अद्यापही झाला नाही. १५ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढू लागली आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी संकटात आहेत. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊसच होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत.  सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावू शकते. 

शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा२0१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीच्या उद्दिष्टापैकी यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५00 हेक्टर, तूर १0000 हेक्टर, मूग २000 हेक्टर, उडीद १५00 हेक्टर, सोयाबीन ३८000 हेक्टर, कपाशी २000 हेक्टर, इतर पिके ५00  हेक्टरील पिकांना सध्या पावसाची गरज  आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.