शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

२.५ लाख हेक्टरवरील पिके धोक्यात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:05 IST

लोणार  : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाऊस गायब आठ दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकटशेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार  : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोणार तालुक्यात कृषी हंगाम हा शेतकर्‍यांची अर्थ वाहिनी आहे. त्यामुळे या हंगामावर शेतकर्‍यांची भिस्त असते. लोणार तालुक्यात सुमारे ३६ हजार शेतकरी आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या. पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावरच ६ आणि ७ जून रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहीत धरून अनेक शेतकर्‍यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. जून महिन्यात झालेल्या पहिल्या दमदार पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस अद्यापही झाला नाही. १५ दिवसांपासून तर पाऊस गायबच झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी तालुक्यात शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढू लागली आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी संकटात आहेत. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊसच होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत.  सध्या ही पिके तग धरून आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर ओढावू शकते. 

शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतीक्षा२0१७ च्या खरीप पिकासाठी एकूण ५४ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीच्या उद्दिष्टापैकी यंदाच्या खरीप हंगाम पिकाच्या क्षेत्रात १ हजार १५२ हेक्टरने वाढ झाली आहे. नियोजनानुसार ज्वारी ५00 हेक्टर, तूर १0000 हेक्टर, मूग २000 हेक्टर, उडीद १५00 हेक्टर, सोयाबीन ३८000 हेक्टर, कपाशी २000 हेक्टर, इतर पिके ५00  हेक्टरील पिकांना सध्या पावसाची गरज  आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.