शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

२0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाने जलक्रांती!

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

नदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सादर : सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, लोणार तालुक्याला लाभ.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)शाश्‍वत सिंचनावर भर देऊन शेतीची स्थिती सुधारण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवारांतर्गत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार व चिखली या चार तालुक्यातील २0 महत्त्वाच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास या चारही तालुक्यातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, यातील ५ नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता मिळाली असून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.वाढते औद्योगिकरण, शहरीकरणासह इतर अनेक कारणांमुळे नद्या मृत होत चालल्या आहेत. पर्यायाने सिंचन क्षमतेवर परिणाम होत असून बारमाही पाणी असणार्‍या नदीकाठच्या विहिरीदेखील कोरड्या पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याची गंभीरतेने दखल घेऊन राज्य सरकारने शेतीसाठी शाश्‍वत सिंचन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणार्‍या जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील आमना नदी, जांभळीचा नाला, मुंजा नदी, वाघुळजा नदी, जीवरेखा नदी, वटसावित्री नदी, धारागिरी नदी, रोहणा नदी व खडकी नदी. सिंदखेडराजा तालुक्यातील पाताळगंगा नदी, खटकळी नदी, तरोळी नदी, विद्रुपा नदी, शिपला नदी, मांगवाडा नदी, मुकवाडा नदी, पापळ ओढा, तर चिखली तालुक्यातील सावित्री नदी व लोणार तालुक्यातील नारळा नदी या २0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५ नद्यांसाठी १ कोटी ८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याने यातून खडकपूर्णा नदी व संत चोखासागर जलाशयाला जोडणार्‍या जांभळी नाला (आमना नदी) २९ लाख ५४ हजार, मुंजा नदी १४ लाख १ हजार, वाघूळजा नदी ३४ लाख ९६ हजार, जीवरेखा नदी ३९ लाख ८३ हजार, वटसावित्री नदी २८ लाख २८ हजार असे एकूण ५ नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी प्रयोगिक तत्त्वावर १ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी मिळाल्याने पावसाळय़ाचे दिवस पाहता त्यांचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार उर्वरित सर्व १५ नद्यांच्या पुनरुज्जीवनास मंजुरात व निधी मिळाल्यास लाभ क्षेत्रातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सिंचनाखाली येणार असून शेती सुजलाम्-सुफलाम् होण्यासह पाणीटंचाईवरही मात होण्यास मोठी मदत होणार आहे.