शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

२0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाने जलक्रांती!

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

नदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सादर : सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, लोणार तालुक्याला लाभ.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)शाश्‍वत सिंचनावर भर देऊन शेतीची स्थिती सुधारण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवारांतर्गत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार व चिखली या चार तालुक्यातील २0 महत्त्वाच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास या चारही तालुक्यातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, यातील ५ नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता मिळाली असून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.वाढते औद्योगिकरण, शहरीकरणासह इतर अनेक कारणांमुळे नद्या मृत होत चालल्या आहेत. पर्यायाने सिंचन क्षमतेवर परिणाम होत असून बारमाही पाणी असणार्‍या नदीकाठच्या विहिरीदेखील कोरड्या पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याची गंभीरतेने दखल घेऊन राज्य सरकारने शेतीसाठी शाश्‍वत सिंचन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणार्‍या जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील आमना नदी, जांभळीचा नाला, मुंजा नदी, वाघुळजा नदी, जीवरेखा नदी, वटसावित्री नदी, धारागिरी नदी, रोहणा नदी व खडकी नदी. सिंदखेडराजा तालुक्यातील पाताळगंगा नदी, खटकळी नदी, तरोळी नदी, विद्रुपा नदी, शिपला नदी, मांगवाडा नदी, मुकवाडा नदी, पापळ ओढा, तर चिखली तालुक्यातील सावित्री नदी व लोणार तालुक्यातील नारळा नदी या २0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५ नद्यांसाठी १ कोटी ८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याने यातून खडकपूर्णा नदी व संत चोखासागर जलाशयाला जोडणार्‍या जांभळी नाला (आमना नदी) २९ लाख ५४ हजार, मुंजा नदी १४ लाख १ हजार, वाघूळजा नदी ३४ लाख ९६ हजार, जीवरेखा नदी ३९ लाख ८३ हजार, वटसावित्री नदी २८ लाख २८ हजार असे एकूण ५ नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी प्रयोगिक तत्त्वावर १ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी मिळाल्याने पावसाळय़ाचे दिवस पाहता त्यांचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार उर्वरित सर्व १५ नद्यांच्या पुनरुज्जीवनास मंजुरात व निधी मिळाल्यास लाभ क्षेत्रातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सिंचनाखाली येणार असून शेती सुजलाम्-सुफलाम् होण्यासह पाणीटंचाईवरही मात होण्यास मोठी मदत होणार आहे.