शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

२0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाने जलक्रांती!

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

नदी पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सादर : सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, लोणार तालुक्याला लाभ.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)शाश्‍वत सिंचनावर भर देऊन शेतीची स्थिती सुधारण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवारांतर्गत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार व चिखली या चार तालुक्यातील २0 महत्त्वाच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास या चारही तालुक्यातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. दरम्यान, यातील ५ नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्तावास प्रायोगिक तत्त्वावर मान्यता मिळाली असून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.वाढते औद्योगिकरण, शहरीकरणासह इतर अनेक कारणांमुळे नद्या मृत होत चालल्या आहेत. पर्यायाने सिंचन क्षमतेवर परिणाम होत असून बारमाही पाणी असणार्‍या नदीकाठच्या विहिरीदेखील कोरड्या पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याची गंभीरतेने दखल घेऊन राज्य सरकारने शेतीसाठी शाश्‍वत सिंचन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होणार्‍या जलसंधारणाच्या विविध कामांमध्ये नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील आमना नदी, जांभळीचा नाला, मुंजा नदी, वाघुळजा नदी, जीवरेखा नदी, वटसावित्री नदी, धारागिरी नदी, रोहणा नदी व खडकी नदी. सिंदखेडराजा तालुक्यातील पाताळगंगा नदी, खटकळी नदी, तरोळी नदी, विद्रुपा नदी, शिपला नदी, मांगवाडा नदी, मुकवाडा नदी, पापळ ओढा, तर चिखली तालुक्यातील सावित्री नदी व लोणार तालुक्यातील नारळा नदी या २0 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी यांनी प्रायोगिक तत्त्वावर ५ नद्यांसाठी १ कोटी ८ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याने यातून खडकपूर्णा नदी व संत चोखासागर जलाशयाला जोडणार्‍या जांभळी नाला (आमना नदी) २९ लाख ५४ हजार, मुंजा नदी १४ लाख १ हजार, वाघूळजा नदी ३४ लाख ९६ हजार, जीवरेखा नदी ३९ लाख ८३ हजार, वटसावित्री नदी २८ लाख २८ हजार असे एकूण ५ नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी प्रयोगिक तत्त्वावर १ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी मिळाल्याने पावसाळय़ाचे दिवस पाहता त्यांचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार उर्वरित सर्व १५ नद्यांच्या पुनरुज्जीवनास मंजुरात व निधी मिळाल्यास लाभ क्षेत्रातील सुमारे ५ हजार २00 एकर शेतजमीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सिंचनाखाली येणार असून शेती सुजलाम्-सुफलाम् होण्यासह पाणीटंचाईवरही मात होण्यास मोठी मदत होणार आहे.