शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

१३८ गावांना पाणीटंचाईची झळ!

By admin | Updated: June 25, 2016 00:55 IST

१0 टक्के पावसानंतरही १५२ टँकर्स सुरू: प्रकल्पांनी गाठला तळ!

विवेक चांदूरकर / बुलडाणा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी मुबलक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत. पाणीटंचाईची धग अजूनही कायम असून, अजूनही १३८ गावांमध्ये १५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गत तीन वर्षांपासून अल्प प्रमाणात पाऊस होत असल्याने यावर्षी जलप्रकल्पांनी तळ गाठला. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. हवामान खात्याने यावर्षी लवकर व मुबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे जून महिन्यात पाणीटंचाईचे संकट दूर होईल, अशी अपेक्षा होती; मात्र जिल्ह्यात २४ जूनपर्यंत केवळ ८६.00 मिमी पाऊस असून, ही टक्केवारी ९.५९ आहे. दहा टक्के पाऊस पडल्यावरही प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली नसून, पाणीटंचाई कायम आहे. जिल्ह्यात अकरा तालुक्यात सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासोबतच जिल्ह्यात ५६९ गावांमध्ये ७७६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी ४८ गावांमध्ये तात्पुरत्या पुरक नळ योजना सुरू करण्यात आल्या. यापैकी १९ गावातील १९ योजना मंजूर असून, १६ गावातील योजना पूर्ण झाल्या आहेत. एका गावातील योजना प्रगतीत आहेत. जिल्ह्यात मेहकर तालुक्यात सर्वात जास्त २६ गावांमध्ये २८ टँकर सुरू आहेत तर बुलडाणा तालुक्यात २४ गावांमध्ये ३३ टँकर, तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील २४ गावांमध्ये २९ टँकर, मोताळा तालुक्यात ७ गावात ७ तर खामगाव तालुक्यात सहा गावात सहा टँकर सुरू आहेत. जून महिना संपत आला तरी चांगला पाऊस झाला नसल्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर हाहाकार माजणार असून, हे संकट अधिकच गडद होणार आहे. शेतकर्‍यांसह सर्वच जण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.