'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:27 PM2021-09-14T16:27:52+5:302021-09-14T16:29:48+5:30

Samantha akkineni and naga chaitanya marriage: काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकलं.

nagarjuna trying to patched up samantha akkineni and naga chaitanya marriage | 'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

googlenewsNext
ठळक मुद्देसाई पल्लवीमुळे समंथा- नागा चैतन्यच्या वैवाहिक आयुष्यात कलह

कलाविश्वात सेलिब्रिटींचे घटस्फोट होणं ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. वर्षानुवर्ष एकमेकांची साथ देणाऱ्या कितीतरी कलाकारांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. यामध्येच प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकार नागा चैतन्य आणि समंथा अक्किनेनी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या आहेत.  काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकलं. तेव्हापासून ही जोडी विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अखेर या चर्चांवर अभिनेता आणि नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी नागा चैतन्यची बाजू मांडली आहे.

"नागा चैतन्यने कधीही त्याच्या पत्नीची फसवणूक केली नाही. २०१७ पासून तो एक आदर्श आणि प्रेमळ पती म्हणूनच तिच्यासोबत राहिला आहे. वैवाहिक आयुष्यातील कोणत्याही मर्यादा, वचन त्याने मोडले नाहीत," असं नागार्जुन म्हणाले.

राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात

पुढे ते म्हणतात,  "मजिली या चित्रपटात तो ऑनस्क्रीन समंथावर रागावला होता. पण त्यावेळी ते रागवणंदेखील त्याला त्रासदायक ठरलं होतं. त्यातच आता त्याला समंथासोबत असलेले मतभेद दूर करण्याचा सल्ला दिला जातोय. मात्र, त्याची सुरुवात कुठून करावी हेच त्याला समजत नाहीये."

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या जोडीमध्ये मतभेद निर्माण झाले असून ते लवकरच विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव हटवलं आहे. सोबतच नागार्जुनच्या वाढदिवशीही ती उपस्थित नव्हती. त्यामुळे नागा चैतन्य आणि तिच्यात नक्कीच काही तरी मतभेद असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

'सगळे जण धर्म नष्ट करण्याच्या मार्गावर'; दहशतवादावर कोंकणा सेन व्यक्त
 

'लव्ह स्टोरी २०२१' या चित्रपटाच्या शूटिंगपासून या दोघांमध्ये वाद सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे समंथा- नागा चैतन्यच्या वैवाहिक आयुष्यात कलह निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.
 

Web Title: nagarjuna trying to patched up samantha akkineni and naga chaitanya marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.