शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षणात घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील आरक्षणाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून नागरीकांचा ...

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील आरक्षणाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून नागरीकांचा मागासप्रवर्ग यात ५० टक्केच्या वर आरक्षण गेल्याने तेथील निवडणूक पुन्हा करण्याचे सुचविलेले आहे. यामुळे उमेदवारांना व जनतेसह प्रशासनाला सुद्धा संकटांना सामोरे जावे लागत आहे. हीच परिस्थिती भंडारा जिल्ह्यात येऊ नये, याकरिता भंडारा जिल्ह्यातील आरक्षणात असलेला घोळ निवडणुकीपूर्वी निकालात काढून निवडणूक लोकशाही मार्गाने निश्चित असलेल्या आरक्षणाच्या आधारे सुरळीत करावी.

२०१० ते २०१५ या वर्षात महिलांना ३३ टक्के आरक्षण होते. २०१५ ते २० या वर्षात पुन्हा शासनाच्या नियमानुसार महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करण्यात आले. या आरक्षणानुसार भंडारा जिल्ह्यातील एकूण ५२ जिल्हा परिक्षेत्रतून जातीनिहाय आरक्षणानुसार ५२ पैकी २६ जागेवर महिलांना आरक्षण दिले. त्यामध्ये गत आरक्षित २६ महिला क्षेत्रात पुन्हा महिलांना आरक्षण न देता फिरत्या चक्रानुसार त्या ठिकाणी पुरुषांना आरक्षण देण्यात यावे, अशी सर्वसाधारण मतदारांची धारणा आहे. मात्र यात २०१५ - २० या वर्षात आता जिथे महिलाना आरक्षण देण्यात आले होते, त्याच जिल्हा परिषद क्षेत्रात सुमारे १३ ठिकाणी पुन्हा महिलांना आरक्षण देण्यात आल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे आरक्षणाचा वाद घोंगावत आहे. ही आरक्षणाची सरासरी टक्केवारी ५१.५० एवढी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सदर आरक्षण वादग्रस्त ठरू शकते.

जिल्हा परिषदेच्या ५२ जागेच्या आरक्षण सोडतीनुसार महिला व पुरुषांना अर्ध्या अर्ध्या जागा सोडलेल्या आहेत. यात फिरत्या चक्रानुसार ज्या ठिकाणी महिला होत्या त्या ठिकाणी पुरुषांना देत आरक्षणाचा तिडा सोडवावा. कोणत्याही प्रवर्गाला ५० टक्केच्या वर जागा जाणार नाही. याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान ठेवून निवडणूक लढली जाईल.

भरत खंडाईत, माजी सदस्य, जिल्हा परीषद क्षेत्र, पालांदूर