शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात सहा घरफोड्या

By admin | Updated: January 27, 2015 23:26 IST

शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालकाच्या घरासह दुसऱ्या एका पोलिसाचे घर चोरट्यानी फोडले. याशिवाय अन्य सहा घरे चोरट्यांनी प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर फोडून

तुमसर : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालकाच्या घरासह दुसऱ्या एका पोलिसाचे घर चोरट्यानी फोडले. याशिवाय अन्य सहा घरे चोरट्यांनी प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर फोडून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. श्रीरामनगर व विनोबा भावे नागरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.शहरातील श्रीरामनगर दाट लोकवस्तीचे व अतिमहत्वाच्या लोकांचे समजले जाते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांच्या घरमालकांचे घर चोरट्यांनी फोडले. संतोष खूमन चौधरी यांच्या घरी चोरी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे याच घरी भाड्याने राहतात.चोरट्यांनी घरी कुणी नाही याच संधीचा फायदा घेतला. आलमारीतील सामान अस्तव्यस्त त्यांनी फेकून दिला. घरातील मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्यात काही चांदीच्या दागीन्यांचाही समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री विनोबा नगरातील तथा पोलिस विभागात कार्यरत पोलिस फुंडे यांचे घरही चोरट्यांनी फोडले. २० हजार नगदी व साड्या चोरीला गेल्या. कृष्णा पटले यांचे घरातील ५ तोळे सोन्यांचे दागीने, तसेच कृष्णा पानतावणे, श्यामसुंदर धुर्वे, सुरचंद पांडे, रामदास साखरकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. चोरटयांनी जी घरे कुलूपबंद होती त्या घरांनाच येथे लक्ष्य केले होते.श्रीरामनगर व विनोबा भावे नगर ही वरची गजबजलेली व नावाजलेली आहे. नोकरदार व लोकप्रतिनिधींचेही वास्तव्य याच परिसरात आहे. ज्या घरी उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे हे भाड्याने राहत आहेत. त्याच परिसरात नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांचे वास्तव्य आहे. मानवअधिकार आयोगाचे अध्यक्ष सुध्दा याच परिसरात राहतात. त्यामुळे हा परिसर व्हीआयपी मानला जातो. चोरट्यांनी येथे चोरीचे धाडस केले. प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर पोलिसांची गस्त होती हे विशेष. चोरट्यांची टोळी परप्रांतीय तथा दुसऱ्या शहरातील असेल असा तर्क लावला जात आहे. चोरट्यांचा अद्याप शोध सुरु आहे. दोन दिवसापासून तुमसर पोलिसांनी सापळा रचून गस्त वाढविल्याचे सांगण्यात येते.आमदारांनी घेतल्या कानपिचक्या पोलिस ठाण्यात आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार चरण वाघमारे यांनी चोरी प्रकरणात पोलिसांच्या कानपिचक्या घेतल्या. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालक व एका पोलिसांच्या घरी घरफोडी झाली तर शहर व या ठाण्यांतर्गत ३२ गावे कशी सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला. ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे तेच येथे सुरक्षित दिसत नाही. चोरट्यांच्या शोध व वचक ठेवण्याची येथे गरज आहे.पोलिस विभाग व शहरातील प्रत्येक बुथनिहाय सुरक्षादल निर्माण करुन समन्वय साधण्याची येथे गरज आहे. सुरक्षा दल गठीत करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे, पोलिस निरीक्षक किशोर गवई यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)