शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

तुमसरात वृक्ष लागवडीचा फज्जा

By admin | Updated: July 14, 2014 00:22 IST

बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याच्या दुतर्फा ३० हजार वृक्ष

बिलाची केली उचल : बावनथडी मुख्य कालव्यातील प्रकारतुमसर : बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याच्या दुतर्फा ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वनविभागाने बावनथडी प्रकल्प विभागाला दिले होते. सध्या येथे एकही वृक्ष उमललेले नसल्याने तीस हजार वृक्ष लागवड योजनेचा फज्जा उडाला आहे. याउलट वृक्ष लागवडीच्या बिलाची उचल करण्यात आली आहे. वृक्ष अस्तित्वात नाहीत तर बिल कसे मंजूर झाले? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. बावनथडी (राजीव सागर) आंतरराज्यीय प्रकल्पाचा मुख्य उजवा कालवा २६.२१ किलोमीटर लांबीचा आहे. तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमधून हा कालवा घनदाट, संरक्षित जंगलांमधून जातो. वन व पर्यावरण विभागाने कालवा प्रकल्पांतर्गत येणारी झाडे तोडण्यासाठी बरीच वर्षे परवानगी दिली नव्हती. त्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. वनकायद्यातून या प्रकल्पाला बाहेर काढण्यासाठी ३५ वर्षांची वाट पहावी लागली. वन विभागाने मुख्य उजव्या कालव्याच्या बांधकामाला काही अटीवर परवानगी दिली. मात्र त्या सोबतच मुख्य उजव्या कालव्याच्या दुतर्फा जवळपास ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही बावनथडी प्रकल्प विभागाला देण्यात आले होते. प्रकल्प विभागानेही ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी दिली होती. एक ते दीड वर्षांपूर्वी प्रकल्पातर्फे येथे वृक्ष लागवडीला थातूरमातूर प्रारंभ करण्यात आला. परंतु येथे एकही वृक्ष जगला नाही. हे वृक्ष प्रकल्पातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी लावली होती. परंतु येथे उजव्या कालव्याशेजारी गावातील नागरिकांची नावे घालून रकमेची उचल करण्यात आली. अशी माहिती आहे. खोटे बिल सादर करून बिल मंजूर करण्यात आले व त्याची उचलही करण्यात आली. अशी विश्वसनीय माहिती आहे. कालव्याच्या दुतर्फा असलेली झाडे ही फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. तत्कालीन उपविभागीय अभियंता पिसे हे या वृक्ष लागवडीचे प्रमुख होते. बिलाची रक्कम उचल करताना संबंधित विभाग जागरुक नव्हते काय? असा सवाल आहे. उद्दिष्ट देणाऱ्यांचेही या ठिकाणी दुर्लक्ष झाले आहे. मुख्य उजव्या कालव्याचा परिसर ओसाड दिसतो. केवळ खुरटी झाडे येथे निदर्शनास आहेत.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत हा प्रकल्प येतो. आतापर्यंत येथे निरीक्षणाकरिता अनेकदा पथक येऊन गेले. परंतु कुणीही गंभीरतेने दखल घेतलेली नाही. वनविभागानेही या योजनेअंतर्गत चौकशीही केली नाही. झाडे लावली कुणी? कुठे गेली? याची शहानिशाही करण्यात आलेली नाही.(तालुका प्रतिनिधी)