शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

यंदाचा पावसाळा शुभ संकेत घेऊन येण्याचे चिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:49 IST

Bhandara news चैत्र नवरात्रीत नऊ दिवसात वातावरणात झालेल्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यावरून यंदा पावसाळा चांगला राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवरात्रीच्या वातावरणातील बदलाने चांगल्या पावसाची चिन्हे

मुखरू बागडे

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : शेतकरी आजही निसर्गाच्या संकेताचा अभ्यास परंपरागत पद्धतीने करताना पावसाचा अंदाज बांधतात. आधुनिक तंत्रज्ञानातही त्यांचे अंदाज तंतोतंत नाही पण जवळपास खरे ठरतात, हा आजवरचा अनुभव आहे. चैत्र नवरात्रीत नऊ दिवसात वातावरणात झालेल्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधला जातो. त्यावरून यंदा पावसाळा चांगला राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या आरंभी व शेवटी पावसाचा जोर अधिक असण्याचे शुभ संकेत आहेत. कोरोना महामारीच्या काळात ही एक दिलासादायक बाब होय.

गतवर्षी पाऊस समाधानकारक बरसला. १०९ टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. पावसावर शेतीचे सर्व गणित अवलंबून असते. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजासोबतच परंपरागत पद्धतीने काढण्यात येणाऱ्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. शेतकरी चैत्र नवरात्रीच्या पर्वात नऊ दिवसांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधतात. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात होणारा वातावरणातील बदल नोंदवून अंदाज बांधला जातो. काही शेतकरी पक्ष्यांच्या हालचालींवरूनही पावसाचा अंदाज बांधताना दिसतात. त्यात कावळा वाळलेली काडी कसा उचलतो. त्याने तोंडात पकडलेली काडी कोणत्या दिशेने अधिक व कोणत्या दिशेने कमी याचाही अभ्यास करून अंदाज घेतला जातो. पक्षी घरटे कुठे बांधतात, किती उंचीवर बांधतात, याचाही अभ्यास करून पावसाचा काळ ठरवला जातो.

गत वर्षभरापासून भारतीय हवामान खात्याचे अंदाज पावसाच्या दृष्टीने निश्चितच तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. वर्षभरात भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाजपत्रक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेले आहे. याला शास्त्रीय आधार असला, तरी भारतीय शेतकऱ्यांचे पारंपरिक असलेले अनुभवसुद्धा काहीअंशी प्रेरणादायी किंवा मार्गदर्शक ठरत आहेत. हिंदी महासागरातील हवामानाच्या बदलावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग निश्चित होतो. तापमान अधिक वाढले की, पावसाची सुरुवात लवकर होण्यास मदत होते.

हिंदू संस्कृतीत नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राचीन काळापासूनच आहे. धार्मिक ग्रंथातून मिळालेला अभ्यास वास्तव परिस्थितीत तपासून नऊ दिवसांतील ऊन-पावसाचा खेळ पावसासाठी महत्त्वाचा ठरतो. नवरात्रीत सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व शेवटीसुद्धा हजेरी लावली. शेवटी हा अंदाज असला तरी काहीअंशी प्रेरक ठरतो.

- रमेश पराते

परंपरागत हवामान अभ्यासक, पालांदूर.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती