शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:38 IST

पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देउकाडा वाढला : पावसाची दडी अन् धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने ऐन हंगामात धोका दिला. त्यामुळे कधी मोटारपंपाच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून बादलीने पाणी देऊन पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. सद्यस्थितीत धानपिकाची ९० टक्के हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस वेळोवेळी दगाफटका करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मनातली भीती कायम आहे.२० दिवसापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मरणासन्न असलेल्या शेतपिकाला नवसंजीवनी मिळाली. आता हे पीक डौलाने उभे आहे. एवढेच नाही तर अंगातून घामाच्या धारा काढणाऱ्या उकाड्यापासूनही सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. पावसाच्या दडीमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरापासून सकाळी ८ वाजतानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पुन्हा कुलर्स, एसी, पंख्यांचा वापर होऊ लागला आहे.मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अत्यल्प असून धरणे, नदी, नाले, बोड्या पाण्याचा साठा कमी आहे. शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने निसटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.