शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अड्याळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ने केले काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

विशाल रणदिवे अड्याळ : ग्रामवासीयांनी आपली समस्या वारंवार सांगूनसुध्दा महामार्ग कंत्राटदार मानायला तयार नाही शेवटी शुक्रवार दुपारच्या सुमारास महामार्गाच्या ...

विशाल रणदिवे

अड्याळ : ग्रामवासीयांनी आपली समस्या वारंवार सांगूनसुध्दा महामार्ग कंत्राटदार मानायला तयार नाही शेवटी शुक्रवार दुपारच्या सुमारास महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरू असणारे नाली बांधकाम अड्याळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बंद केले त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामस्थांना गावातील सांडपाणी हे गावाबाहेर असणाऱ्या नाल्यापर्यंत गेले पाहिजे, अशी मागणी आजची नसून आधीपासूनची आहे. महत्त्वाचे म्हणजे तसा अहवालसुध्दा महामार्ग कंत्राटदार यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना एक सोडून दोनदा तसा पत्रव्यवहार करूनही याकडे लक्ष घातले जात नाही आणि आज शेवटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढे गावाला त्रास होऊ नये यासाठी हा पाऊल उचलले असल्याचे मत यावेळी सरपंच जयश्री कुंभलकर यांनी व्यक्त केले आहे.

गावातील दोन्ही बाजूला म्हणजे पेट्रोल पंप आणि वंजारी राइस मिलपर्यंत दोन्ही बाजूला असणाऱ्या नाल्याचे बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. यामुळेच ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण गावातील संपूर्ण सांडपाणी वाहून जर गावाच्या बाहेर निघाला तर पावसाळ्यात होणारा त्रास होणार नाही तसेच आता ज्या ठिकाणी दोन्ही रस्त्याच्या बाजूला नाल्यांची शेवट होणार त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याचा धोका उद्भवू शकतो आणि हा धोका जर टाळायचा असेल तर होणारे नाल्यांचे बांधकाम लांबी वाढविणे गरजेचे आहे आणि अशा प्रकारची माहिती या आधी कंत्राटदार यांनी लेखी स्वरूपात उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना ४ जून २०२० व ३० जानेवारी २०२१ ला असे दोनदा दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. गेली सहा महिन्यात यावर तत्काळ पणे संबंधित अधिकारी यांनी जर कारवाई केली असती तर आज कदाचित हे काम बंद पडले नसते; पण आज कंत्राटदार यांना जर तसा आदेश आला तर आम्ही काम करण्यास तयार आहोत, असेही यावेळी कंत्राटदार अधिकारी गिरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

गावच्या दोन्ही बाजूला महामार्गाच्या बांधकाम झाले असले तरी गावातून आतापर्यंत बांधकाम ना धळ नालीचे झाले ना रस्त्याचे ना विद्युत ना पाणी पुरवठा होणाऱ्या पाइपलाइनचे झाले आहे जिथे काम झाले ते झाले; पण पूर्ण काहीच नाही त्यामुळे अड्याळ ग्रामवासी त्रस्त आहेत; पण याकडे लक्ष द्यायलासुद्धा संबंधित विभाग अधिकारी यांच्याकडे वेळ नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता नवीन चर्चा गावात सुरू आहे ती म्हणजे भुयारी पादचारी मार्ग तर दुसरीकडे दिवायडर अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर ग्रामस्थ चिंता व्यक्त करत असतानासुद्धा येथील लोकप्रतिनिधी मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याने आता ग्रामवासी मोठा पवित्रा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.