शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अड्याळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ने केले काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

विशाल रणदिवे अड्याळ : ग्रामवासीयांनी आपली समस्या वारंवार सांगूनसुध्दा महामार्ग कंत्राटदार मानायला तयार नाही शेवटी शुक्रवार दुपारच्या सुमारास महामार्गाच्या ...

विशाल रणदिवे

अड्याळ : ग्रामवासीयांनी आपली समस्या वारंवार सांगूनसुध्दा महामार्ग कंत्राटदार मानायला तयार नाही शेवटी शुक्रवार दुपारच्या सुमारास महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुरू असणारे नाली बांधकाम अड्याळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बंद केले त्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामस्थांना गावातील सांडपाणी हे गावाबाहेर असणाऱ्या नाल्यापर्यंत गेले पाहिजे, अशी मागणी आजची नसून आधीपासूनची आहे. महत्त्वाचे म्हणजे तसा अहवालसुध्दा महामार्ग कंत्राटदार यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना एक सोडून दोनदा तसा पत्रव्यवहार करूनही याकडे लक्ष घातले जात नाही आणि आज शेवटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढे गावाला त्रास होऊ नये यासाठी हा पाऊल उचलले असल्याचे मत यावेळी सरपंच जयश्री कुंभलकर यांनी व्यक्त केले आहे.

गावातील दोन्ही बाजूला म्हणजे पेट्रोल पंप आणि वंजारी राइस मिलपर्यंत दोन्ही बाजूला असणाऱ्या नाल्याचे बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. यामुळेच ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण गावातील संपूर्ण सांडपाणी वाहून जर गावाच्या बाहेर निघाला तर पावसाळ्यात होणारा त्रास होणार नाही तसेच आता ज्या ठिकाणी दोन्ही रस्त्याच्या बाजूला नाल्यांची शेवट होणार त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्याचा धोका उद्भवू शकतो आणि हा धोका जर टाळायचा असेल तर होणारे नाल्यांचे बांधकाम लांबी वाढविणे गरजेचे आहे आणि अशा प्रकारची माहिती या आधी कंत्राटदार यांनी लेखी स्वरूपात उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना ४ जून २०२० व ३० जानेवारी २०२१ ला असे दोनदा दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे. गेली सहा महिन्यात यावर तत्काळ पणे संबंधित अधिकारी यांनी जर कारवाई केली असती तर आज कदाचित हे काम बंद पडले नसते; पण आज कंत्राटदार यांना जर तसा आदेश आला तर आम्ही काम करण्यास तयार आहोत, असेही यावेळी कंत्राटदार अधिकारी गिरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

गावच्या दोन्ही बाजूला महामार्गाच्या बांधकाम झाले असले तरी गावातून आतापर्यंत बांधकाम ना धळ नालीचे झाले ना रस्त्याचे ना विद्युत ना पाणी पुरवठा होणाऱ्या पाइपलाइनचे झाले आहे जिथे काम झाले ते झाले; पण पूर्ण काहीच नाही त्यामुळे अड्याळ ग्रामवासी त्रस्त आहेत; पण याकडे लक्ष द्यायलासुद्धा संबंधित विभाग अधिकारी यांच्याकडे वेळ नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता नवीन चर्चा गावात सुरू आहे ती म्हणजे भुयारी पादचारी मार्ग तर दुसरीकडे दिवायडर अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर ग्रामस्थ चिंता व्यक्त करत असतानासुद्धा येथील लोकप्रतिनिधी मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याने आता ग्रामवासी मोठा पवित्रा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.