शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाशिवाय मागासलेपण दूर होणे अशक्य

By admin | Updated: March 1, 2015 00:35 IST

स्वतंत्र विदर्भाचा लढा फार जुना आहे. नागपूर करारानुसार लोकसंख्येच्या २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील युवकांना द्यावयाच्या होत्या. केवळ ८ टक्क्यावर समाधान केले.

भंडारा : स्वतंत्र विदर्भाचा लढा फार जुना आहे. नागपूर करारानुसार लोकसंख्येच्या २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील युवकांना द्यावयाच्या होत्या. केवळ ८ टक्क्यावर समाधान केले. नोकरीतील अनुशेष, सिंचनाचा अनुशेष, भारनियमन वैदर्भीय जनतेच्या वाट्याला, हा अन्याय आम्ही कुठपर्यंत सहन करणार? हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही विदर्भ राज्य मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निमंत्रक अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.सिंदखेडराजा ते कालेश्वर गडचिरोलीदरम्यान आयोजित विदर्भ गर्जना यात्रेचे आज शनिवारला पवनी, अड्याळ, भंडारा, मोहाडी, तुमसर शहरात उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. पवनीत सौरभ दिवटे, जिल्हा समन्वयक मधूकर कुकडे, अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर, विलास काटेखाये, रंजना गागंर्डे, दुर्वास धार्मिक, रमांकात पशिने, विजय राजदेरकर, भक्तराज गजभिये, लोमेश वैद्य, पालिका उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर यांनी स्वतंत्र राज्य निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लढा द्यावा लागेल असे मत मांडले. संचालन डॉ. अनिल धकाते यांनी केले. भंडारा शहरात यात्रेचे दुपारी २ वाजता आगमन झाले. यावेळी डॉ. रमेशकुमार गजबे म्हणाले, विदर्भ हा पूवीर्पासून निसर्गदत्त संपत्ती व साधनांनी परिपूर्ण आहे. विदर्भाच्याच भरोश्यावर महाराष्ट्राची शान आहे, नोकऱ्यांची टक्केवारी कमी, बजेटमध्ये निधी कमी दिला जातो. कुपोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. हे मागासलेपण दूर करून जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन केले. (लोकमत चमू)आमदारांनी दाखविली पाठस्वतंत्र विदर्भाचा प्रश्न आजवर जेव्हा-जेव्हा समोर आला त्यावेळी भाजप अग्रेसर राहिली होती. परंतु राज्यात सत्तेवर येताच भाजपने विदर्भाच्या मुद्याला बगल देत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते आहोत असे सांगत समर्थन देतात आणि दुसरीकडे अशा आयोजनाकडे पाठ फिरवून त्याचा विरोध करण्याचा प्रकार आज आलेल्या विदर्भ गर्जना यात्रेदरम्यान दिसून आला. ही यात्रा शनिवारला भंडारा, तुमसर विधानसभा मतदारसंघातून मार्गस्थ झाली. जिल्ह्यात तिन्ही आमदार भाजपचे आहेत. ठिकठिकाणी विदर्भ गर्जना यात्रेची सभा झाली. परंतु एकाही सभेत जिल्ह्यातील आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्यांना सहभागी व्हावेसे वाटले नाही. त्यावरुन त्यांच्या स्वतंत्र विदर्भाचा कळवळा दिसून येतो.