शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्याशिवाय जुन्या गावाचे सपाटीकरण करू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:54 IST

सुरेवाडा येथील ३० टक्के प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना भुखंड व घरांच्या जागेचा मोबदला तसेच वाढीव कुटूंब आणि शेतींचा मोबदला मिळाल्याशिवाय जुने गाव सपाटीकरण करू देणार नाही, .....

ठळक मुद्देसुरेवाडा येथील प्रकल्पग्रस्तांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरेवाडा येथील ३० टक्के प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना भुखंड व घरांच्या जागेचा मोबदला तसेच वाढीव कुटूंब आणि शेतींचा मोबदला मिळाल्याशिवाय जुने गाव सपाटीकरण करू देणार नाही, असा इशारा सुरेवाडा येथील प्रकल्पबाधीत असलेल्या अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे.सुरेवाडा प्रकल्पग्रस्त गावांचे कुटुंब सर्व्हेक्षण २००६-०७ वर्षी शासनाच्या नियमानुसार झाले. त्यावेळेस कुटुंब व लाभार्थी संख्या ४९१ होती. व लाभार्थ्यांना ५७२ अवैध भुखंडाचे वाटप करून माटोरा या गावाच्या सिमेवर भुखंड देवून शासनातर्फे स्थानांतरण करण्यात आले. त्यानुसार सदर पुनर्वसन जागेवर ७० लाभार्थी त्या गावात यातना भोगत आहेत. शासनाने ७० लाभार्थ्यांची पुनर्वसन केले असून ३० लाभार्थ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा त्या प्रकरणाबाबत संबंधित अधिकारी लक्ष देण्याच्या मानसिकतेत नसल्याचा आरोप केला आहे.सुरेवाडा हे गाव १९१६-१७ या वर्षाच्या महसूल रेकार्डनुसार संबंधित मालगुजार श्री अन्नासाहेब सुबेदार यांच्या मालकीच्या जागेवर बसलेल्या आहेत. पण यांची नोंद महसूल विभागाच्या दस्तऐवजात नमूद आहे. सदर जागा वहिवाटीनुसार मालगुजार यांनी त्या जागेचा मोबदला घेऊन मालकी हक्क दिलेला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त घरांची जागा ही आबादी व शासकीय नसून मालमत्ता धारकांच्या मालकीची आहे. व त्या नुसार घराच्या व जागेचा मोबदला द्यावयास पाहिजे होता तो देणे शासनास अनिवार्य आहे.सन १९४२, १९४७, १९६२, १९७७ या वर्षाच्या वैनगंगा नदीच्या महापुरामुळे संपूर्ण सुरेवाडा हे गाव बुडित क्षेत्रात येत असल्यामुळे शासनाने १९६२ साली बुडित क्षेत्र गाव घोषित करून शासनाच्या दप्तरी नोंद करून या गावाची शासनाकडून दुसºया ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार होते व जागेचा अभावी संपूर्ण गावाचे पुनर्वसन न करता १९६२ यावर्षी फक्त १० टक्के लोकांचे या मार्गावरील टोलीवर पुनर्वसन करण्यात आले होते.सदर पुरबुडित क्षेत्रात येत असल्यामुळे त्या गावाची भूमिअभिलेखन कार्यालयाकडून गावठान सर्वे करण्यात आले नाही. त्यामुळे सदर गाव घराची जागा व घरे शासनाने पुर बुडित क्षेत्रात येत असल्याने व गावाच्या सर्वे नाही झाल्यामुळे महसूल रेकार्डला चुकीची नोंद करून संपूर्ण मालमत्ता ही गाव ठाण्यात जाग्यावर आहे, असे १९६२ यावर्षी चुकीची नोंद करून मालकीच्या जागेला शासकीय रेकार्डवर दाखविण्यात आले आहे ही खेदाची बाब आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीसुद्धा सदर प्रकल्पग्रस्तांच्या घराच्या जागेच्या मोबदला शासनाने देणे गरजेचे आहे. व शासनाने केलेली चूक ही दुरूस्ती करणेसुद्धा गरजेचे आहे.सदर ७० टक्के गाव नवीन जागेत स्थलांतर झाल्यामुळे ३० टक्के मधील लाभार्थी व वन्यप्राणी व सरपटणाºया प्राण्यांच्या भितीने व त्यांचे पुनर्वसन न झाल्याने काही लाभार्थी जीवनावश्यक वस्तू प्रकल्पग्रस्त घरातच ठेवून शेजारच्या गावात भाड्याने राहतात. १० आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांचे जुने घर पाडण्याच्या व जागा सपाटीकरण करण्याचे शासनाने आदेश दिले आहे. त्यामुळे शासनाने आदी ३० टक्के अन्यायग्रस्त नागरिकांना भुखंड द्यावे.पुनर्वसन झालेल्यांना वाढीव कुटूंबाच्या मोबदला द्यावे, तरच प्रकल्पग्रस्तांची जुने घरे पाडून सपाटीकरण करावे, असा इशारा सुरेवाडवासियांनी दिला आहे. याप्रकरणी त्यांनी गोसेखुर्द पुनर्वसन उपविभाग आंबाडी (भंडारा) येथील सहायक अभियंता यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना सुरेवाडा येथील मारोती हारगुडे, भाऊराव उके, मनोहर उके, सुरेश पवनकर, दिनेश भोवनकर आदी उपस्थित होते.