शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दर घटूनही धानाची आवक वाढली

By admin | Updated: December 12, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.

मार्केट यार्ड हाऊसफुल्ल : ऊस, गुळाचे कोठार असले तरी शेतकरी संकटातमोहन भोयर तुमसरधानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मागील दोन महिन्यात या बाजारपेठेत १ लाख ४५ हजार क्विंटल धान विक्रीकरिता आले. धानाला भाव नसूनही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव धान विक्री करावी लागत आहे. जवळच्या मध्यप्रदेशातूनही येथे धान विक्रीला आणले जाते, हे विशेष.१५ आॅक्टोंबर ते १० डिसेंबरपर्यंत तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर जय श्रीराम, एचएमटी तथा इतर धान १.४५ लाख क्विंटल विक्री करण्यात आली. जय श्रीराम धानाचा प्रति क्विंटल भाव २१५०, एचएमटीचा १८५० ते १९५० व १०१० धानाचा भाव १२०० ते १२५० इतका आहे. धानाची आवक बाजार समितीत वाढली. भंडारा जिल्ह्यात धानाची मोठी व एकमेव बाजारपेठ आहे. मध्यप्रदेशातील शेतकरीही येथे धान विक्रीला आणतात. येथे गुळाची मोठी बाजारपेठ असून ऊसाचे नगदी पीक येथील शेतकऱ्यांनी सुरु केले. पंरतु ऊसाला भाव मिळत नसल्याने व सिंचन सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली. यावर्षी धान पिकाची उतारी नाही. धान पिकाचा दर्जा घसरला आहे. उत्पादन कमी व खर्च वाढला त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कर्ज काढून शेती केली तरीही खर्च निघाला नाही. बाजार समितीच्या मार्केट यार्डात एकाचवेळी आवक वाढल्याने धान ठेवायला जागा नाही. वजन काटा करण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. संचालक मंडळाला मुदतवाढयेथील बाजार समितीच्या १९ सदस्यीय संचालक मंडळ दोनदा मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या मुदतवाढीचा कार्यकाळ डिसेंबरअखेरपर्यंत आहे. जिल्हा निबंधकांनी अद्ययावत मतदार याद्या मागितल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बाजार समितीची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी येथे प्रशसकीय संचालक मंडळ नियुक्तीच्या हालचालींना वेग आला होता, परंतु त्यात यश आले नाही.आठ कोटींच्या निधीची प्रतीक्षा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमसर बाजार समितीला भेट दिली होती. त्यावेळी बाजार समितीचा व्याप, कार्यक्षेत्र व समितीला होणारा नफा पाहून आठ कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, आणि निधी अडला.वेअर हाऊसची क्षमता कमीधानाची आवक वाढली, पंरतु बाजार समितीच्या वेअर हाऊसची क्षमता एक हजार मेट्रीक टनाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल बऱ्याचदा उघड्यावरच ठेवावा लागतो. येथे शेतकऱ्यांकरिता शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. धान्य सुरक्षतेकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे.